शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

मुंबईत विजय दोघा भार्इंचा

By admin | Updated: December 31, 2015 00:34 IST

विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले, तर शिवसेनेकडून रामदास कदम यांनी आमदारकीची माळ गळ््यात घातली.राष्ट्रवादीकडून प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आधीपासूनच निवडणुक रंगत होणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी लाड यांना मतदान केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुपी युती पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना एकतर्फी विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याने कदम यांना आश्वासक विजयावर समाधान मानावे लागले. यावर भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. या आधी सकाळी पालिका मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली़ अपेक्षित संख्याबळ असल्याने शिवसेनेचे रामदास कदम यांनी ८६ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीने काँग्रेसचा विजय लांबला. अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसला अन्य पक्षावर अवलंबून राहणे भाग होते़ याउलट प्रस्तापित भाजपशी छुपी युती करत, राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागेवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या भाई जगताप यांनी लाड यांना धुर चारली. लाड यांनी विजयासाठी सर्व शक्तीला पणाला लावली होती़ मात्र, विजयाची खात्री असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात दोन तासांनंतर ५८ आणि लाड यांच्या पारड्यात ५५ मते पडल्याचे जाहीर झाले़ भाई जगताप विजयी झाल्याचे कळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून वाजत-गाजत मिरवणूक काढली. जगताप यांची घोड्यावरून काढलेली मिरवणूक यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. महापालिकेसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडे मिरवत आनंद साजरा केला. तर शिवसेनेचे रामदास कदम यांच्या पाठिराख्यांनीही घोषणा देत परिसर दणाणून सोडला. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी - भाजपची छुपी युती यावेळी उघड दिसून आली. भाजपने पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्र्यांनी जागा दिली नसली, तरी मतदानही केलेले नाही. मात्र, शिवसैनिकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जिंकून दिले आहे.- रामदास कदम, विजयी उमेदवारहा तर मुख्यमंत्र्यांचा पराभव...मुख्यमंत्र्यांना काँग्रसेचा पराभव करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. भारतीय जनता पक्ष नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण करत आली आहे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या निवडणुकीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.- भाई जगताप, विजयी उमेदवार