शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुंबईत विजय दोघा भार्इंचा

By admin | Updated: December 31, 2015 00:34 IST

विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत बुधवारी काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत अवघ्या तीन मतांच्या फरकाने काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले, तर शिवसेनेकडून रामदास कदम यांनी आमदारकीची माळ गळ््यात घातली.राष्ट्रवादीकडून प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, आधीपासूनच निवडणुक रंगत होणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी लाड यांना मतदान केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुपी युती पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना एकतर्फी विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केल्याने कदम यांना आश्वासक विजयावर समाधान मानावे लागले. यावर भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची प्रतिक्रिया रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. या आधी सकाळी पालिका मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली़ अपेक्षित संख्याबळ असल्याने शिवसेनेचे रामदास कदम यांनी ८६ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र, राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीने काँग्रेसचा विजय लांबला. अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसला अन्य पक्षावर अवलंबून राहणे भाग होते़ याउलट प्रस्तापित भाजपशी छुपी युती करत, राष्ट्रवादीने काँग्रेसच्या जागेवर डल्ला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र काँग्रेसच्या भाई जगताप यांनी लाड यांना धुर चारली. लाड यांनी विजयासाठी सर्व शक्तीला पणाला लावली होती़ मात्र, विजयाची खात्री असलेल्या काँग्रेसच्या पारड्यात दोन तासांनंतर ५८ आणि लाड यांच्या पारड्यात ५५ मते पडल्याचे जाहीर झाले़ भाई जगताप विजयी झाल्याचे कळताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून वाजत-गाजत मिरवणूक काढली. जगताप यांची घोड्यावरून काढलेली मिरवणूक यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. महापालिकेसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडे मिरवत आनंद साजरा केला. तर शिवसेनेचे रामदास कदम यांच्या पाठिराख्यांनीही घोषणा देत परिसर दणाणून सोडला. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी - भाजपची छुपी युती यावेळी उघड दिसून आली. भाजपने पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला आहे. मुख्यमंत्र्यांनी जागा दिली नसली, तरी मतदानही केलेले नाही. मात्र, शिवसैनिकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जिंकून दिले आहे.- रामदास कदम, विजयी उमेदवारहा तर मुख्यमंत्र्यांचा पराभव...मुख्यमंत्र्यांना काँग्रसेचा पराभव करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. भारतीय जनता पक्ष नेहमीच सूडबुद्धीचे राजकारण करत आली आहे, हेच यातून पुन्हा स्पष्ट होते. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या निवडणुकीच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.- भाई जगताप, विजयी उमेदवार