शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

भिकाऱ्यांच्या दोन खुनातून लहरिया निर्दोष

By admin | Updated: December 30, 2016 17:17 IST

सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 30 - प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खून खटल्यातून संशयित आरोपी सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.  रेल्वे स्थानक परिसरात मे आणि जून २०१३ मध्ये पदपथावर झोपलेल्या पाच ते सहा भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सीरियल किलर दिलीप लहरिया याला अटक केली. लहरियावर तीन खूनांचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खुनाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी १२ साक्षीदार तपासले होते. या खटल्याचा शुक्रवारी अंतिम निकाल झाला. लहरियावर १९ जून २०१२ रोजी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीच्या सुभाष रोडवर दुकानाच्या दारात झोपलेली वृध्दा शकुंतला महादेव जाधव (वय ६०) हिचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याची सुनावणी ३ जानेवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे लहरिया दोन खुनाच्या गुन्ह्यांतून निर्दोष झाला असला तरी वृद्धेच्या खुनाच्या सुनावणीमुळे त्याची पुन्हा कळंबा कारागृहात रवानगी केली. या मुद्द्यावरून झाला निर्दोषसंशयित लहरिया याचा खून करण्यामागे कोणताही हेतू नव्हता. सरकार पक्षातर्फे जे साक्षीदार तपासले ते नेहमीचे पंच आहेत. तसेच काही गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत. लहरिया हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार झाले. त्याच्या समोर जो तपास केला गेला, त्याची जाणीव त्याला नव्हती. भिकाऱ्यांच्या खून मालिकेदरम्यान मुंबईहून पथक कोल्हापूरात आले होते. त्यामुळे आपल्यावरील डाग पसून टाकण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी घाईगडबडीने लहरियाला अटक केली. लहरियाच्या अटकेनंतर दोन महिन्यांनी शिर्डीमध्ये भिकाऱ्यांच्या खूनप्रकरणी सचिन रामदास वैष्णव या सीरियल किलरला शिर्डी पोलिसांनी अटक केली होती. त्याने चौकशीमध्ये कोल्हापुरातील भिकाऱ्यांच्या खुनाची कबुली दिली. त्याने हे खून केले नसतील कशावरुन त्यासंबधी कोल्हापूर पोलिसांनी काय चौकशी केली. लहरिया हा मनोरुग्ण आहे; त्यामुळे त्याला गुन्ह्यांत दोषी ठरविता येणार नाही. पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनविला आहे. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करावी. असा युक्तिवाद वकील अ‍ॅड. दत्तात्रय कवाळे यांनी मांडला होता.