शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

भिकाऱ्यांच्या दोन खुनातून लहरिया निर्दोष

By admin | Updated: December 30, 2016 17:17 IST

सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 30 - प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खून खटल्यातून संशयित आरोपी सीरियल किलर दिलीप कुॅँवरसिंह लहरिया (वय २७, रा. पथरिया, ता. बिलासपूर, जि. दुर्ग, छत्तीसगड) याची जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.  रेल्वे स्थानक परिसरात मे आणि जून २०१३ मध्ये पदपथावर झोपलेल्या पाच ते सहा भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सीरियल किलर दिलीप लहरिया याला अटक केली. लहरियावर तीन खूनांचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील दोघा भिकाऱ्यांच्या खुनाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी १२ साक्षीदार तपासले होते. या खटल्याचा शुक्रवारी अंतिम निकाल झाला. लहरियावर १९ जून २०१२ रोजी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीच्या सुभाष रोडवर दुकानाच्या दारात झोपलेली वृध्दा शकुंतला महादेव जाधव (वय ६०) हिचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याची सुनावणी ३ जानेवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे लहरिया दोन खुनाच्या गुन्ह्यांतून निर्दोष झाला असला तरी वृद्धेच्या खुनाच्या सुनावणीमुळे त्याची पुन्हा कळंबा कारागृहात रवानगी केली. या मुद्द्यावरून झाला निर्दोषसंशयित लहरिया याचा खून करण्यामागे कोणताही हेतू नव्हता. सरकार पक्षातर्फे जे साक्षीदार तपासले ते नेहमीचे पंच आहेत. तसेच काही गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत. लहरिया हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार झाले. त्याच्या समोर जो तपास केला गेला, त्याची जाणीव त्याला नव्हती. भिकाऱ्यांच्या खून मालिकेदरम्यान मुंबईहून पथक कोल्हापूरात आले होते. त्यामुळे आपल्यावरील डाग पसून टाकण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी घाईगडबडीने लहरियाला अटक केली. लहरियाच्या अटकेनंतर दोन महिन्यांनी शिर्डीमध्ये भिकाऱ्यांच्या खूनप्रकरणी सचिन रामदास वैष्णव या सीरियल किलरला शिर्डी पोलिसांनी अटक केली होती. त्याने चौकशीमध्ये कोल्हापुरातील भिकाऱ्यांच्या खुनाची कबुली दिली. त्याने हे खून केले नसतील कशावरुन त्यासंबधी कोल्हापूर पोलिसांनी काय चौकशी केली. लहरिया हा मनोरुग्ण आहे; त्यामुळे त्याला गुन्ह्यांत दोषी ठरविता येणार नाही. पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनविला आहे. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करावी. असा युक्तिवाद वकील अ‍ॅड. दत्तात्रय कवाळे यांनी मांडला होता.