शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

दोन बँकर्सना चार वर्षांची शिक्षा

By admin | Updated: November 1, 2015 01:59 IST

हर्षद मेहताचा घोटाळा म्हणून परिचित असलेल्या १९९२ मधील अब्जावधी रुपयांच्या घोटाळ््यातील एका खटल्यात विशेष न्यायालयाने स्टेट बँक आॅफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या

मुंबई : हर्षद मेहताचा घोटाळा म्हणून परिचित असलेल्या १९९२ मधील अब्जावधी रुपयांच्या घोटाळ््यातील एका खटल्यात विशेष न्यायालयाने स्टेट बँक आॅफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या त्यावेळच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरवून, त्यांना प्रत्येकी चार वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.१९९२ हर्षद मेहताच्या स्टॉक मार्केट घोटाळ्यामुळे गाजले. देशाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. या घोटाळ्यातील आरोपींवर ‘ट्रॅन्झॅक्शन इन सेक्युरिटिज’ कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. न्या. रोशन दळवी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २९ आॅक्टोबर रोजी स्टेट बँक आॅफ सौराष्ट्रच्या फंड मॅनेजमेंट सेलचे (एफएमसी) तत्कालीन मुख्य व्यवस्थापक एम.एस. श्रीनिवासन आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) सिक्युरिटी विभागाचे अधिकारी आर. सीतारामन यांना दोषी ठरवले. भारतीय दंडसंहितेच्या वेगवगेळ्या कलमांतर्गत त्यांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मेहता आणि अन्य आरोपींनी हातमिळवणी करून एसबीएस आणि एसबीआयच्या पैशांची अफरातफर केली. या घोटाळ्याप्रकरणी २२ जणांवर खटला चालवण्यात येत आहेत. त्यापैकी १४ जण सरकारी कर्मचारी आहेत, तर आठ दलाल आहेत. यामध्ये हर्षद मेहता मुख्य आरोपी आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्या पाठोपाठ अन्य तीन जणांचेही खटल्यादरम्यानच निधन झाले, तर अन्य जणांची खटल्यातून मुक्तता करण्यात आली. तर बाकीच्या आरोपींची संशयाच्या फायद्यावर सुटका करण्यात आली. श्रीनिवासन आणि सीतारामन यांनीही आधी कच्चे कैदी म्हणून तुरुंगात काढलेला काळ शिक्षेतून वळता केला जावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, ते फार काळ गजाआड राहणार नाहीत. (प्रतिनिधी)हा एक प्रकारे देशद्रोहच !या दोघांमुळे एसबीएस आणि एसबीआयला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सरकारी कर्मचारी म्हणून या नुकसानीस ते जबाबदार आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, असे विशेष न्यायालयाने दोघांना शिक्षा देताना म्हटले. या केसमध्ये तक्रारदार देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. आरोपींनी सार्वजनिक आर्थिक संस्थांच्या तिजोऱ्या खाली केल्या. त्यांच्यामुळे देशाला फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यांचे हे कृत्य ‘देशद्रोहा’ च्या व्याख्येत बसते. १९९२ च्या घोटळ्यामुळे देशाला फार मोठ्या आर्थिक नुकसानीतून जावे लागेल, असे निरीक्षण न्या. दळवी यांनी नोंदवले.