शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दोन बँकर्सना चार वर्षांची शिक्षा

By admin | Updated: November 1, 2015 01:59 IST

हर्षद मेहताचा घोटाळा म्हणून परिचित असलेल्या १९९२ मधील अब्जावधी रुपयांच्या घोटाळ््यातील एका खटल्यात विशेष न्यायालयाने स्टेट बँक आॅफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या

मुंबई : हर्षद मेहताचा घोटाळा म्हणून परिचित असलेल्या १९९२ मधील अब्जावधी रुपयांच्या घोटाळ््यातील एका खटल्यात विशेष न्यायालयाने स्टेट बँक आॅफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या त्यावेळच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरवून, त्यांना प्रत्येकी चार वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.१९९२ हर्षद मेहताच्या स्टॉक मार्केट घोटाळ्यामुळे गाजले. देशाचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. या घोटाळ्यातील आरोपींवर ‘ट्रॅन्झॅक्शन इन सेक्युरिटिज’ कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. न्या. रोशन दळवी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने २९ आॅक्टोबर रोजी स्टेट बँक आॅफ सौराष्ट्रच्या फंड मॅनेजमेंट सेलचे (एफएमसी) तत्कालीन मुख्य व्यवस्थापक एम.एस. श्रीनिवासन आणि स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) सिक्युरिटी विभागाचे अधिकारी आर. सीतारामन यांना दोषी ठरवले. भारतीय दंडसंहितेच्या वेगवगेळ्या कलमांतर्गत त्यांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली.सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मेहता आणि अन्य आरोपींनी हातमिळवणी करून एसबीएस आणि एसबीआयच्या पैशांची अफरातफर केली. या घोटाळ्याप्रकरणी २२ जणांवर खटला चालवण्यात येत आहेत. त्यापैकी १४ जण सरकारी कर्मचारी आहेत, तर आठ दलाल आहेत. यामध्ये हर्षद मेहता मुख्य आरोपी आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्या पाठोपाठ अन्य तीन जणांचेही खटल्यादरम्यानच निधन झाले, तर अन्य जणांची खटल्यातून मुक्तता करण्यात आली. तर बाकीच्या आरोपींची संशयाच्या फायद्यावर सुटका करण्यात आली. श्रीनिवासन आणि सीतारामन यांनीही आधी कच्चे कैदी म्हणून तुरुंगात काढलेला काळ शिक्षेतून वळता केला जावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, ते फार काळ गजाआड राहणार नाहीत. (प्रतिनिधी)हा एक प्रकारे देशद्रोहच !या दोघांमुळे एसबीएस आणि एसबीआयला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सरकारी कर्मचारी म्हणून या नुकसानीस ते जबाबदार आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, असे विशेष न्यायालयाने दोघांना शिक्षा देताना म्हटले. या केसमध्ये तक्रारदार देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. आरोपींनी सार्वजनिक आर्थिक संस्थांच्या तिजोऱ्या खाली केल्या. त्यांच्यामुळे देशाला फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यांचे हे कृत्य ‘देशद्रोहा’ च्या व्याख्येत बसते. १९९२ च्या घोटळ्यामुळे देशाला फार मोठ्या आर्थिक नुकसानीतून जावे लागेल, असे निरीक्षण न्या. दळवी यांनी नोंदवले.