शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

मुख्यमंत्री कार्यालयात अडीच लाख तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 06:01 IST

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या २० महिन्यांत विविध विभागांबाबत तब्बल २ लाख ४४ हजार १२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या २० महिन्यांत विविध विभागांबाबत तब्बल २ लाख ४४ हजार १२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या दस्तरखुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाबाबत आहेत. ७१ हजार ४७५ नागरिकांनी त्याबाबत अर्ज केले आहेत. त्यानंतर महसूल, नगर विकास, सामान्य प्रशासन व ग्रामीण विकास या विभागाचा समावेश ‘टॉप फाइव्ह’मध्ये आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१६ या कालावधीत फडणवीस यांच्या कार्यालयात विविध खात्यांबाबत आलेल्या तक्रारीची माहिती विचारली होती. त्यानुसार त्यांना कळविण्यात आले आहे की, २० महिन्यांत विविध ३१ विभागांत २,४४,११२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये गृह विभागाबाबत ७१ हजार ४७५, त्यापाठोपाठ महसूल व वन (२४,२९३), नगर विकास (१५,३८८), सामान्य प्रशासन (९,४६१) व ग्रामीण विकास (९,३६८) यांचा समावेश आहे. एकूण तक्रारींपैकी या पाच विभागांतील तक्रारींची संख्या ५३.२४ टक्के आहे. महिन्याला सरासरी १२ हजार २०५ तक्रार अर्ज येतात. त्याशिवाय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय (६३८२), मुख्य सचिव (७२४), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (११८९), वस्त्रोद्योग आणि पणन (७७७६), रोजगार व स्वयंरोजगार (६६७), पर्यावरण (६६७), वित्त (२२८८), अन्न व नागरी पुरवठा (२८७५), उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण (३,६९३), गृहनिर्माण (८७०८) आदी विभागांत तक्रारी आल्या आहेत. रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे गेल्या १२ महिन्यांचा अभिलेख उपलब्ध नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले असून, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत ५५ आणि १ जानेवारी ते ३० जून २०१५ या कालावधीत ५४७ तक्रारी आल्याचे नमूद केले आहे. गृह विभागासह बहुतेक विभागांतील अधिकाऱ्यांकडून नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना तक्रार निवारण करण्याची सूचना करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे. (प्रतिनिधी)