शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पीक नुकसानीसाठी आता दुप्पट मदत

By admin | Updated: December 22, 2015 02:03 IST

न्यप्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीपोटी शासनातर्फे द्यावयाच्या आर्थिक मदतीमध्ये आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे,

नागपूर : वन्यप्राण्यांकडून झालेल्या पीक नुकसानीपोटी शासनातर्फे द्यावयाच्या आर्थिक मदतीमध्ये आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे, यासंदर्भात शासन अध्यादेशसुद्धा काढण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सेवा हमी कायद्याअंतर्गत २६ दिवसांच्या आत संबधितंना मदत करणे बंधनकारक आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली. शंभुराजे देसाई, शशिकांत शिंदे, विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, वन्यप्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीसाठी पूर्वी अतिशय तुटपुंजी मदत मिळत असे. २०-२० रुपयांचे धनादेश काढले जायचे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा होत होती. परंतु शासनाने यात बदल केला आहे. ९ जुलै २०१५ रोजी यासंदर्भातील एक जीआरसुद्धा काढण्यात आला आहे. त्यानुसार कमीत कमी नुकसानभरपाई ही हजार रुपये दिली जाईल. १० हजार रुपयांपर्यंतचे होणारे नुकसान पूर्वी ५० टक्के दिले जात होते. ते आता पूर्ण १० हजार रुपये दिले जाईल. याशिवाय वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुणे पॅटर्न राबविले जात आहे. या अतंर्गत नुकसानीसाठी अर्थसंकल्पात तरतूद असो किंवा नसो झालेली मदत ही दिलीच जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीसाठी असलेल्या पद्धीतीतील त्रुटी व दोष दूर करण्यात आले आहेत. राईट टू सर्व्हिस या कायद्याअंतर्गत असलेल्या ४३ सेवांमध्ये १० सेवा या वनविभागाशी संबंधित आहेत. त्यामुळे २६ दिवसात ही मदत करणे बंधनकारक असून तसे न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाईची तरतूदसुद्धा त्यात आहे. यासंदर्भात दर सोमवारी राज्याचा आढावा घेतला जातो. पंचनाम्यासाठी आता खूप लोकांची गरज नाही. ती संख्या कमी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील फुलपाखरू उद्यानात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला, यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)सोलर कुंपण योजना अपयशीशंभुराजे देसाई यांनी शेतीला तारांचे कुंपण लावण्याची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, शेतीचे नुकसान रोखण्यासाठी शासनाने सोलर कुंपण देण्याची योजना आणली होती. परंतु त्याचा काहीच लाभ झालेला नाही. त्यामुळे यासंदर्भात आणखी काय करता येईल, यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. संत्रा पिकांचाही होणार समावेश आशिष देशमुख यांनी वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी संत्रा आणि लिंबुवर्गीय फळांचाही समावेश करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी यासंदर्भात शासन गंभीर असून नक्कीच समावेश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.