शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

नक्षली हल्ल्यात वीस वर्षात १२ हजारांवर लोक ठार

By admin | Updated: July 19, 2016 18:22 IST

पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.19 -  पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची सुरक्षा दलांची चकमक आणि नक्षलवाद्यांनी पेलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात सोमवारी १० जवान ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांनी गेल्या वीस वर्षात देशातील १२ हजारांवर लोकांचा जीव घेतलेला आहे. यामध्ये २७१२ जवान शहीद झाले आहेत.
आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र ही नक्षल प्रभावित राज्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ पर्यंत नक्षली हल्ला किंवा त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत ९४७१ नागरिक मृत्यूमुखी पडले; तर २७१२ केंद्रीय आणि राज्य सरकारचे जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगढमध्ये महेंद्र कर्मा यांनी ‘सलवा जुडम’ मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खातमा करण्याची योजना राबविली होती. त्याची किंमत २५ मे २००१३ मधील एका हल्ल्यात काँग्रेसला चुकवावी लागली. यामध्ये कर्मा यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल त्यांचा मुलगा दिनेश आणि अन्य २५ जण मृत्यूमुखी पडले. याच हल्ल्यात जखमी झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचेही नंतर निधन झाले.
 
नक्षलप्रभावित नऊ राज्यांमध्ये नक्षली हल्ल्यात आजवर झालेले मृत्यू असे, सन १९९३ -४६८, १९९४ - ३७६, १९९५ - ३९६,१९९६ -४५४,१९९७ -५८३,१९९८ -४८९,१९९९ -५९५,२००० -५४८,२००१ -५६४,२००२ -४८१,२००३ -५१५,२००४ -५६५,२००५ -५६९,२००६ -६७८,२००७ -६९१,२००८ -७१७,२००९ -९०८,२०१० -१००५,२०११ -६०८,२०१२ -४१५,२०१३ ते २०१५ -४२२ हून अधिक.