शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली हल्ल्यात वीस वर्षात १२ हजारांवर लोक ठार

By admin | Updated: July 19, 2016 18:22 IST

पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.19 -  पश्चिम बंगालमधील नक्षलबारीमध्ये जन्मलेल्या नक्षलवादाच्या राक्षसाने भारतात मोठ्या प्रमाणावर भय आणि अस्थिरता पसरवली आहे. बिहारमधील नक्षलवाद्यांबरोबरची सुरक्षा दलांची चकमक आणि नक्षलवाद्यांनी पेलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात सोमवारी १० जवान ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांनी गेल्या वीस वर्षात देशातील १२ हजारांवर लोकांचा जीव घेतलेला आहे. यामध्ये २७१२ जवान शहीद झाले आहेत.
आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र ही नक्षल प्रभावित राज्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ पर्यंत नक्षली हल्ला किंवा त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत ९४७१ नागरिक मृत्यूमुखी पडले; तर २७१२ केंद्रीय आणि राज्य सरकारचे जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगढमध्ये महेंद्र कर्मा यांनी ‘सलवा जुडम’ मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खातमा करण्याची योजना राबविली होती. त्याची किंमत २५ मे २००१३ मधील एका हल्ल्यात काँग्रेसला चुकवावी लागली. यामध्ये कर्मा यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल त्यांचा मुलगा दिनेश आणि अन्य २५ जण मृत्यूमुखी पडले. याच हल्ल्यात जखमी झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचेही नंतर निधन झाले.
 
नक्षलप्रभावित नऊ राज्यांमध्ये नक्षली हल्ल्यात आजवर झालेले मृत्यू असे, सन १९९३ -४६८, १९९४ - ३७६, १९९५ - ३९६,१९९६ -४५४,१९९७ -५८३,१९९८ -४८९,१९९९ -५९५,२००० -५४८,२००१ -५६४,२००२ -४८१,२००३ -५१५,२००४ -५६५,२००५ -५६९,२००६ -६७८,२००७ -६९१,२००८ -७१७,२००९ -९०८,२०१० -१००५,२०११ -६०८,२०१२ -४१५,२०१३ ते २०१५ -४२२ हून अधिक.