शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

यंत्रमाग उद्योजकांना अडीच कोटींचा फटका

By admin | Updated: December 30, 2014 23:40 IST

महावितरणचा आडमुठेपणा : साडेपाच हजार वीज ग्राहक सवलतीपासून वंचित, इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात अस्वस्थता

राजाराम पाटील - इचलकरंजी -राज्य शासनाने वाढीव वीज बिलातून सर्व उद्योगांची सुटका केली असली तरी महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे येथील सुमारे साडेपाच हजार वीज ग्राहकांना या सवलतीपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना महिन्याला अडीच कोटी रुपयांचा फटका बसत असल्याने येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे.सन २०१२-१३ मध्ये महानिर्मिती कंपनीला वीज उत्पादनात झालेल्या नुकसानीपोटी वीजदरात वाढ करण्याची मंजुरी महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने दिली होती. त्याप्रमाणे महावितरण कंपनीने वीस टक्के वीज दरवाढ करतो, असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात मात्र यंत्रमाग उद्योगाला ५० टक्के दरवाढ झाली होती. हा निर्णय सप्टेंबर २०१३ मध्ये घेतला होता. या दरवाढीच्या विरोधात राज्यातील सर्वच वीज ग्राहकांकडून जोरदारपणे विरोध झाल्यामुळे तत्कालीन कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने दरमहा ७०६ कोटी रुपयांचे अनुदान महावितरणला देऊन दरवाढ टाळली होती. मात्र, नवीन भाजपप्रणीत सरकार सत्तेवर येताच त्यांनी अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे यंत्रमाग उद्योगाला प्रतियुनिट ३ रुपये २५ पैसे असणारा वीजदर ४ रुपये ८५ पैसे झाला होता. अशाप्रकारे अन्यायी वीज दरवाढ झाल्याबद्दल पुन्हा यंत्रमाग उद्योगातून उठाव झाला.याबाबत इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची १० डिसेंबरला तातडीने भेट घेतली. वीजदरवाढीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊर्जा व वित्त मंत्रालयाचे अधिकारी व मंत्री यांची तातडीने बैठक घेतली आणि अनुदान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तशा आशयाच्या शासन निर्णयाचे परिपत्रक त्याचवेळी महावितरण कंपनीला दिले होते. ते परिपत्रक इंटरनेटद्वारे सर्वत्र उपलब्ध झाले. त्यामुळे इचलकरंजीतील सुमारे ६५ टक्के वीज ग्राहकांना आलेल्या वीज बिलामध्ये योग्य ती दुरुस्ती करून महावितरण कंपनीने त्यावेळी बिले भरून घेतली होती. आता इचलकरंजीतील ए झोनमध्ये यंत्रमागधारकांना बिले मिळाली आहेत. मात्र, ती वाढीव दराची असल्याने उद्योजकांनी या बिलांविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्या शासन निर्णयाचे परिपत्रक महावितरण कंपनीला मिळाले नसल्याने वाढीव दराची बिले कमी करून दिली जाणार नाहीत, अशी भूमिका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. परिणामी, सुमारे साडेपाच हजार यंत्रमागधारकांना अडीच कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. एकाच शहरामध्ये ६५ टक्के उद्योजकांना मिळणारी वीजदराची सवलत ३५ टक्के उद्योजकांना मिळत नसल्याने आणि महावितरण कंपनीच्या आडमुठ्या दुजाभावामुळे येथील यंत्रमागधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.शासनाचा फार्स की, महावितरणचे ढोंगडिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात यंत्रमाग उद्योगाला मिळणाऱ्या वाढीव वीज बिलामध्ये दुरुस्ती करून पूर्वीच्याच दराने बिले भरून घेणाऱ्या महावितरणचे अधिकारी आता शासनाचे परिपत्रक मिळाले नाही, अशी आडमुठी भूमिका घेत आहेत. वास्तविक शासन निर्णयाचे परिपत्रक इंटरनेटवर उपलब्ध असून, याची प्रत महावितरणला जारी केल्याचे या परिपत्रकात नोंद असतानासुद्धा वीजदराची सवलत देण्याचा फार्स केला किंवा कंपनी अज्ञानाचे ढोंग करीत आहे, असा प्रश्न येथील यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी उपस्थित केला आहे.