शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

बारावीत कोकण अव्वल

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

राज्यात प्रथम : विभागात सिंधुदुर्गचा झेंडा, कोकणचा ९५.६८ टक्के निकाल; राज्याचा निकाल ९१.२६ टक्के

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९५.६८ टक्के इतका लागला आहे. सलग चौथ्या वर्षी कोकण मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.६२ टक्क्यांनी निकाल अधिक असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ अमरावती मंडळाचा ९२.५० टक्के, तर नागपूर मंडळाचा ९२.११ टक्के इतका निकाल लागला आहे. अमरावती व नागपूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी सचिव रमेश गिरी, सहसचिव किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी रघुनाथ अटुगडे उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून ३१ हजार ५५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३० हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १६ हजार ५१४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ५०९ विद्यार्थी (९३.९१ टक्के), तर १५ हजार १७३ विद्यार्थिनींपैकी १४ हजार ८०९ (९७.६० टक्के) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९ हजार ७५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल ९५.०८ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार ६२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.७२ टक्के इतका लागला आहे. यावर्षी कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याने झेंडा फडकविला आहे.कोकण विभागात १९४ कनिष्ठ महाविद्यालये असून, २१ परीरक्षक केंद्रे, तर ४७ परीक्षा केंदे्र आहेत.दि.४ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत.(प्रतिनिधी)ेसर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचाकोकण विभागात सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला आहे. विज्ञान शाखेत ९५.७२ टक्के, वाणिज्य शाखेत ९१.६0 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत ८९.२0 टक्के, तर कला शाखेत ८६.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.कॉपीचे प्रमाण ०.०३ टक्केकोकण विभागातून एकूण ३१ हजार ६८७ विद्यार्थी बसले होते. पैकी कॉपीचे एकूण ०.०८ प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे एकूण प्रमाण ०.०३ टक्के इतके आहे. राज्यात सर्वांत कमी कॉपीचे प्रमाण लातूर येथे असून, ०.०६ कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून, टक्केवारी ०.०३ इतके आहे.निकालाचा वाढता आलेखमागील तीन वर्षांचा कोकण विभागाचा बारावीचा निकाल पाहता वाढता आलेख दिसून येत आहे. २०१२ मध्ये ८५.८८, २०१३ मध्ये ९४.८५, तर २०१४ मध्ये ९५.६ टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ९५.६८ टक्के इतका निकाल लागला असून, निकालात ०.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४७.७७ टक्केकोकण विभागातून ९८८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४७२ विद्यार्थी पास झाले आहेत. विभागाचा एकूण निकाल ४७.७७ टक्के इतका लागला आहे. पुनर्परीक्षार्थींमध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४६.४७ टक्के, तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५१.३२ टक्के इतके आहे.