शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

बारा जातपंचायती बरखास्त

By admin | Updated: March 22, 2016 04:13 IST

येथील भटके जोशी समाजाने जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने राज्यातील बारावी जातपंचायत बरखास्त झाली आहे.

नाशिक : येथील भटके जोशी समाजाने जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने राज्यातील बारावी जातपंचायत बरखास्त झाली आहे. मात्र मनमानी कारभार करणाऱ्या हजारो जातपंचायती अद्यापही राज्यात कार्यरत असल्याचा अंदाज आहे.तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहाचा राग मनात ठेवून पित्यानेच आपल्या नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीचा खून केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. जातपंचायतीच्या दबावातून ही हत्या झाल्याचे समोर आले आणि त्यातून जातपंचायतींचा निर्दयी कारभारही उजेडात आला. अंनिसचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अनिष्ट जातपंचायतींच्या विरोधात लढा उभारला. आॅगस्ट २०१३ मध्ये नाशिकमध्ये जातपंचायत मूठमाती परिषद झाली. त्यानंतर येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा लढा सुरू ठेवला. आतापर्यंत राज्यातील बारा जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत.अहमदनगरच्या मढी व माळेगाव येथे जातपंचायतींची केंद्रे होती. तेथे शेकडो जातपंचायती भरत आणि त्यासाठी हजारो लोक जमत, मात्र प्रबोधनामुळे दोन वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एकही जातपंचायत भरलेली नाही. (प्रतिनिधी)