शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

'रात्रीस खेळ चाले' बंद करा - शिवसेना

By admin | Updated: March 2, 2016 15:26 IST

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेविरोधात चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेने या मालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ - 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेविरोधात चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिवसेनेने या मालिकेविरोधात आंदोलन छेडले आहे. ही मालिका तात्काळ बंद करावी या मागणीसाठी बुधवारी शिवसैनिकांनी लोअर परेल येथील झी मराठी वाहिनीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या मालिकेतून भूत-प्रेत, आत्मे आणि देवदेवस्की सारख्या अंधश्रध्दांना खतपाणी घातले जात असून, त्यामुळे कोकणची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेत शिवसेनेने या मालिकेविरोधात बुधवारी आंदोलन केले. 
 
कोकणताल्या काही संघटनांनाही या मालिकेमुळे कोकणची बदनामी होत असल्याचा दावा करत मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. या मालिकेमुळे कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला फटका बसू शकतो अशी भितीही काही जणांनी व्यक्त केली आहे. मागच्या आठवडयापासून सुरु झालेली ही मालिका हळूहळू रंगतदार वळणावर येत असताना या मालिकेविरोधात आंदोलने सुरु झाल्यामुळे आता या मालिकेचे काय होणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. या कुटुंबातील एका मुलाचा साखरपुडा होणार असतो. त्याची लगबग सुरु असते. मात्र त्यापूर्वीच कुटुंबप्रमुखाचे अचानक निधन होते आणि त्यानंतर एकपाठोपाठ एक धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. पुढच्या भागात कोकणची चांगली बाजू दाखवू अस आश्वासन मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी दिल आहे.