शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

महापालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा बंद

By admin | Updated: August 26, 2016 00:52 IST

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी करण्यात आली.

पुणे : कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी करण्यात आली. मात्र, आता काही वर्षांनंतर बहुतेक विभागांतील ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. कर्मचारी मात्र त्यामुळे बिनधास्त झाले असून, पूर्वीप्रमाणेच कार्यालयात उशिरा येऊन मस्टरवर नंतर सह्या ठोकत आहेत.पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली. ‘रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले’, ‘साहेबांनी सकाळी येताना एक काम सांगितले होते’ अशी विविध कारणे उशिरा येण्यासाठी दिली जात होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवरच येणे भाग पडू लागले. तरीही उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेची नोंदणी थेट विभागप्रमुखांना मिळेल अशी व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली होती. त्यामुळे सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखाने त्यांच्या त्या-त्या दिवसांच्या रजा मांडण्यास सुरुवात केली. कायम उशिरा येणाऱ्यांच्या रजा त्यांना माहिती न पडता संपू लागल्या. काही जणांच्या रजा संपून त्यांना बिनपगारी रजा अशी नोंद होऊ लागली. असे होत आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ व जाऊही लागले. त्यातून शिस्त लागली.मात्र आता बहुतेक विभागांमधील ही यंत्रणा बिघडली आहे. विभागप्रमुखांना उपस्थितीचा जो अहवाल मिळत होता, तो मिळणे बंद झाले आहे. त्यांना कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टवरच्या सह्यांवरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. विभागप्रमुखांनी याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार केली. ही यंत्रणा बसविणाऱ्या कंपनीशी बोलून त्यातील बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. रजिस्टर ताब्यात घेण्यास सुरुवातबायोमेट्रिक उपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना मिळत नाही याची माहिती झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा उशिरा येणे सुरू केले आहे. उशिरा येऊन रजिस्टरवर सह्या ठोकल्या जातात. त्यामुळे आता विभागप्रमुखांनी कार्यालयीन वेळेनंतर रजिस्टर ताब्यात घेण्याची पूर्वीचीच पद्धत पुन्हा सुरूवात केली आहे. यापेक्षा बायोमेट्रिक यंत्रणा लवकर सुरू करावी, असे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे.>ही यंत्रणा बसविण्याचे कोणत्या कंपनीने काम केले आहे याची माहिती घेऊ. विभागप्रमुखांकडूनही त्यांची यंत्रणा कधी बसविली, कधी नादुरुस्त याची माहिती मागवून घेऊ. यंत्रणा त्वरित दुरुस्त होऊन सुरळीत कार्यान्वित होईल, याची काळजी घेण्यात येईल.- सुहास मापारी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग (प्रभारी)