शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

महापालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा बंद

By admin | Updated: August 26, 2016 00:52 IST

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी करण्यात आली.

पुणे : कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी करण्यात आली. मात्र, आता काही वर्षांनंतर बहुतेक विभागांतील ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. कर्मचारी मात्र त्यामुळे बिनधास्त झाले असून, पूर्वीप्रमाणेच कार्यालयात उशिरा येऊन मस्टरवर नंतर सह्या ठोकत आहेत.पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली. ‘रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले’, ‘साहेबांनी सकाळी येताना एक काम सांगितले होते’ अशी विविध कारणे उशिरा येण्यासाठी दिली जात होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवरच येणे भाग पडू लागले. तरीही उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेची नोंदणी थेट विभागप्रमुखांना मिळेल अशी व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली होती. त्यामुळे सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखाने त्यांच्या त्या-त्या दिवसांच्या रजा मांडण्यास सुरुवात केली. कायम उशिरा येणाऱ्यांच्या रजा त्यांना माहिती न पडता संपू लागल्या. काही जणांच्या रजा संपून त्यांना बिनपगारी रजा अशी नोंद होऊ लागली. असे होत आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ व जाऊही लागले. त्यातून शिस्त लागली.मात्र आता बहुतेक विभागांमधील ही यंत्रणा बिघडली आहे. विभागप्रमुखांना उपस्थितीचा जो अहवाल मिळत होता, तो मिळणे बंद झाले आहे. त्यांना कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टवरच्या सह्यांवरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. विभागप्रमुखांनी याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार केली. ही यंत्रणा बसविणाऱ्या कंपनीशी बोलून त्यातील बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. रजिस्टर ताब्यात घेण्यास सुरुवातबायोमेट्रिक उपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना मिळत नाही याची माहिती झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा उशिरा येणे सुरू केले आहे. उशिरा येऊन रजिस्टरवर सह्या ठोकल्या जातात. त्यामुळे आता विभागप्रमुखांनी कार्यालयीन वेळेनंतर रजिस्टर ताब्यात घेण्याची पूर्वीचीच पद्धत पुन्हा सुरूवात केली आहे. यापेक्षा बायोमेट्रिक यंत्रणा लवकर सुरू करावी, असे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे.>ही यंत्रणा बसविण्याचे कोणत्या कंपनीने काम केले आहे याची माहिती घेऊ. विभागप्रमुखांकडूनही त्यांची यंत्रणा कधी बसविली, कधी नादुरुस्त याची माहिती मागवून घेऊ. यंत्रणा त्वरित दुरुस्त होऊन सुरळीत कार्यान्वित होईल, याची काळजी घेण्यात येईल.- सुहास मापारी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग (प्रभारी)