शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’ निघण्याची आफत - उद्धव ठाकरे

By admin | Updated: April 26, 2017 07:41 IST

धोरण बदललं नाही तर एका जाहिरातीप्रमाणे ‘तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका’ असा अनुभव घ्यावा लागेल अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - एकीकडे शेती उत्पादकता वाढवण्याच्या गोष्टी सत्ताधारी करीत आहेत आणि दुसरीकडे उत्पादकता वाढूनही तूरडाळ उत्पादकांना जर पडलेले भाव आणि थांबलेल्या खरेदीला तोंड द्यावे लागत असेल तर कसे व्हायचे? खरेदी केंद्रांवर नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांची तूरडाळ खरेदी करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला ते चांगलेच झाले. त्यामुळे तूरडाळीचा ‘तडका’ काहीसा शांत होईल. मात्र तो पुन्हा होऊ नये यासाठी ‘बाजारात तुरी आणि…’ हे धोरण सरकारला बदलावे लागेल. अन्यथा त्या एका जाहिरातीप्रमाणे ‘तूरडाळीचा तडका और अंग अंग भडका’ असा अनुभव घ्यावा लागेल अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे.
 
आपल्या देशात दुष्काळ असला तरी शेतकरी भरडला जातो आणि दुष्काळ नसला तरी नागवला जातो. कधी व्यापा-यांकडून, कधी अडते-दलालांकडून तर कधी सरकारी पातळीवरील नियोजनाच्या ऐशीतैशीमुळे शेतकऱ्याचे भरडणे सुरूच राहते. खरं तर यंदा तूरडाळ उत्पादन भरघोस झाल्याने शेतकरी खुशीत होता, पण तूरडाळ खरेदीतील गोंधळामुळे त्याची प्रचंड ससेहोलपट झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ त्याच्यावर आली. या गोष्टीही टाळता येण्यासारख्याच होत्या. योग्य नियोजन झाले असते, त्यानुसार धोरणात सुसूत्रता राखली गेली असती तर ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल दराने ३०-३५ लाख टन तूरडाळ खरेदी करूनही सरकारच्याच कानाखाली तूर‘जाळ’निघण्याची आफत आली नसती असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील शेतकरी परिस्थितीच्या कचाटय़ात कसा सापडला आहे ते तूरडाळ खरेदीच्या गोंधळामुळे पुन्हा दिसले. विषय कांदा उत्पादकांच्या अनुदानाचा असो, कापूस एकाधिकार खरेदीचा असो, तूरडाळ खरेदीचा असो किंवा धान्याच्या आयात-निर्यातीवरील बंधनांचा; शेतकऱ्याची ससेहोलपट झाल्याशिवाय किंवा तो रस्त्यावर उतरल्याशिवाय त्याच्या पदरात काही पडतच नाही अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 
 
संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्नही असाच शेतकऱ्याच्या मानेभोवती फास बनूनच राहिला आहे. आता भरघोस उत्पादन येऊनही पडलेला भाव आणि खरेदीतील सरकारी गोंधळ या चरकात तूर उत्पादक पिळला जात आहे. त्याला दिलेला ‘खरेदीचा हात’ सरकारला मध्येच सोडता येणार नाही. ‘शेवटचा दाणाही खरेदी करू’ हे आश्वासन पूर्ण केले नाही तर शेतकरी राज्य सरकारवर विश्वास कसा ठेवणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
गेल्या वर्षी तूरडाळ उत्पादन कमी झाल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी या पिकाला प्राधान्य दिले. सरकारनेही त्यासाठी उत्तेजन दिले आणि निसर्गानेही शेतक-याच्या पदरात भरभरून दान टाकले. तरीही त्याची ससेहोलपट होणार असेल तर तूर लावण्याची ‘चूक’ तो कदाचित करणार नाही आणि तूरडाळीच्या दुष्काळाचे व भाववाढीचे संकट उद्या पुन्हा उभे राहील. सरकारने आयात-निर्यातीत पैसा घालवण्यापेक्षा सामान्य शेतकऱयाच्या खिशात त्याने कष्टाने पिकवलेल्या पिकाचे हक्काचे ‘देणे’ कसे पडेल याचा विचार करायला हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.