शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

By admin | Updated: September 19, 2016 02:57 IST

मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत.

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे आसनपोई गावच्या हद्दीत नदीपात्रात हजारो मासे मृत पावल्याची मागील आठवड्यातील घटना ताजी असतानाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत. हे रसायनमिश्रित सांडपाणी गटार व नाल्याद्वारे शेवटी नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याने नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. कारखान्याबाहेर सोडण्यात येणारे हे सांडपाणी नाल्यात तसेच मोकळ्या जागेत साचून राहिल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन देखील नेहमीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मात्र कारखान्याचे हे उद्योग दिसेनासे झाले आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर जागोजागी तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करण्याचे काम देखील एमआयडीसीकडून केले जात नसल्याचे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसीकडून दरवर्षी नालेसफाई केवळ कागदोपत्रीच केली जात असल्याचे आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून व कारखानदारांकडून केले जात आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांच्या बाहेरील नाल्यांमध्ये प्रदूषित सांडपाणी सर्वत्र साचल्याचे दिसून येत असतानाही प्रदूषण मंडळाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे औद्योगिक क्षेत्रातील सर्व रासायनिक कारखान्यातील सांडपाणी हे प्रक्रिया करूनच वाहिनीद्वारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येते. त्या ठिकाणी सुमारे तीस किमी अंतरावर वाहिनीद्वारे खाडीत सोडण्यात येते. मात्र दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचविण्यासाठी पावसाळ्यात अनेक कारखान्यातून हे सांडपाणी प्रक्रि या न करताच परस्पर, कारखान्याबाहेर सोडले जात आहे. या प्रदूषणकारी कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तीन फिल्ड आॅफिसर्स प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात असतानाही औद्योगिक क्षेत्रातील राजरोसपणे सुरु असलेले प्रदूषण रोखण्यास प्रदूषण मंडळाला अपयश येत असल्याने ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. (वार्ताहर)>औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबतची ही वस्तुस्थिती सत्य असून प्रक्रिया न करताच परस्पर कारखान्याबाहेर सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांवर चौकशी करून कठोर कारवाई करू.- सागर औटी, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण मंडळ