शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

By admin | Updated: September 19, 2016 02:57 IST

मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत.

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे आसनपोई गावच्या हद्दीत नदीपात्रात हजारो मासे मृत पावल्याची मागील आठवड्यातील घटना ताजी असतानाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत. हे रसायनमिश्रित सांडपाणी गटार व नाल्याद्वारे शेवटी नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याने नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. कारखान्याबाहेर सोडण्यात येणारे हे सांडपाणी नाल्यात तसेच मोकळ्या जागेत साचून राहिल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन देखील नेहमीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मात्र कारखान्याचे हे उद्योग दिसेनासे झाले आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर जागोजागी तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करण्याचे काम देखील एमआयडीसीकडून केले जात नसल्याचे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसीकडून दरवर्षी नालेसफाई केवळ कागदोपत्रीच केली जात असल्याचे आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून व कारखानदारांकडून केले जात आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांच्या बाहेरील नाल्यांमध्ये प्रदूषित सांडपाणी सर्वत्र साचल्याचे दिसून येत असतानाही प्रदूषण मंडळाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे औद्योगिक क्षेत्रातील सर्व रासायनिक कारखान्यातील सांडपाणी हे प्रक्रिया करूनच वाहिनीद्वारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येते. त्या ठिकाणी सुमारे तीस किमी अंतरावर वाहिनीद्वारे खाडीत सोडण्यात येते. मात्र दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचविण्यासाठी पावसाळ्यात अनेक कारखान्यातून हे सांडपाणी प्रक्रि या न करताच परस्पर, कारखान्याबाहेर सोडले जात आहे. या प्रदूषणकारी कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तीन फिल्ड आॅफिसर्स प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात असतानाही औद्योगिक क्षेत्रातील राजरोसपणे सुरु असलेले प्रदूषण रोखण्यास प्रदूषण मंडळाला अपयश येत असल्याने ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. (वार्ताहर)>औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबतची ही वस्तुस्थिती सत्य असून प्रक्रिया न करताच परस्पर कारखान्याबाहेर सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांवर चौकशी करून कठोर कारवाई करू.- सागर औटी, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण मंडळ