शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

महाड एमआयडीसीत सांडपाण्याने तुंबले नाले

By admin | Updated: September 19, 2016 02:57 IST

मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत.

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे आसनपोई गावच्या हद्दीत नदीपात्रात हजारो मासे मृत पावल्याची मागील आठवड्यातील घटना ताजी असतानाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत कारखान्यात दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच हे सांडपाणी नाल्यात सोडल्याचे दिसून येत आहेत. हे रसायनमिश्रित सांडपाणी गटार व नाल्याद्वारे शेवटी नदीच्या प्रवाहात मिसळत असल्याने नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. कारखान्याबाहेर सोडण्यात येणारे हे सांडपाणी नाल्यात तसेच मोकळ्या जागेत साचून राहिल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन देखील नेहमीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मात्र कारखान्याचे हे उद्योग दिसेनासे झाले आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर जागोजागी तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करण्याचे काम देखील एमआयडीसीकडून केले जात नसल्याचे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एमआयडीसीकडून दरवर्षी नालेसफाई केवळ कागदोपत्रीच केली जात असल्याचे आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून व कारखानदारांकडून केले जात आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांच्या बाहेरील नाल्यांमध्ये प्रदूषित सांडपाणी सर्वत्र साचल्याचे दिसून येत असतानाही प्रदूषण मंडळाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे औद्योगिक क्षेत्रातील सर्व रासायनिक कारखान्यातील सांडपाणी हे प्रक्रिया करूनच वाहिनीद्वारे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवण्यात येते. त्या ठिकाणी सुमारे तीस किमी अंतरावर वाहिनीद्वारे खाडीत सोडण्यात येते. मात्र दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचविण्यासाठी पावसाळ्यात अनेक कारखान्यातून हे सांडपाणी प्रक्रि या न करताच परस्पर, कारखान्याबाहेर सोडले जात आहे. या प्रदूषणकारी कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तीन फिल्ड आॅफिसर्स प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात असतानाही औद्योगिक क्षेत्रातील राजरोसपणे सुरु असलेले प्रदूषण रोखण्यास प्रदूषण मंडळाला अपयश येत असल्याने ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली आहे. (वार्ताहर)>औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबतची ही वस्तुस्थिती सत्य असून प्रक्रिया न करताच परस्पर कारखान्याबाहेर सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांवर चौकशी करून कठोर कारवाई करू.- सागर औटी, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण मंडळ