शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कचरा साठल्याने तुंबला नाला

By admin | Updated: June 8, 2016 02:19 IST

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत.

पाली : वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत. यातच पाली येथील भोईआळीसमोर असलेल्या नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.भोईआळीतील आजूबाजूची घरे, कार्यालये, दुकाने, भाजी मंडया, उपाहारगृह, रुग्णालय या सर्व ठिकाणाहून अनेक वेगवेगळ्या प्रकारचा कचरा रोजच्या रोज या नाल्यामध्ये टाकला जातो. यामुळे या नाल्याचे पाणी तुंबले आहे. हा नाला पालीतील आचार्य वाडा, जुनी स्टेट बँक, आगरआळी, भोईआळी येथून वाहत असतो. याच नाल्यातील पाणी हे पुढे जाऊन अंबा नदीला मिळते. अंबा नदीचे पाणी संपूर्ण पालीकरांना विनाशुध्दीकरण करता मिळते. यामुळे पालीकरांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या नाल्यात टाकलेला कचरा हा रोजच्या रोज साफ न केल्याने हा कचरा कुजला आहे, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीस सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने हा कचरा रोजच्या रोज साफ करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. नाल्याशेजारी कचराकुंडी असावी, अशी मागणी आम्ही गेली कित्येक दिवस करीत आहोत. कचराकुंडी असल्यास ग्रामस्थ कचरा कुंडीत टाकतील व नाला तुंबणार नाही, परंतु ग्रामपंचायत आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.- चंद्रकांत आंबेकर, माजी सदस्य, ग्रामपंचायत पाली पावसाळ्यात तुंबणार नाला ?या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असून पाली ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे नाला तुंबून मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.>नालेसफाईची मागणीपालीतील नाले व गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, माती आणि विविध प्रकारचा कचरा साठला आहे. वेळीच तो साफकरण्यात आला नाही तर पावसाचे पाणी नाल्यात व गटारात तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.