शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कचरा साठल्याने तुंबला नाला

By admin | Updated: June 8, 2016 02:19 IST

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत.

पाली : वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत. यातच पाली येथील भोईआळीसमोर असलेल्या नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.भोईआळीतील आजूबाजूची घरे, कार्यालये, दुकाने, भाजी मंडया, उपाहारगृह, रुग्णालय या सर्व ठिकाणाहून अनेक वेगवेगळ्या प्रकारचा कचरा रोजच्या रोज या नाल्यामध्ये टाकला जातो. यामुळे या नाल्याचे पाणी तुंबले आहे. हा नाला पालीतील आचार्य वाडा, जुनी स्टेट बँक, आगरआळी, भोईआळी येथून वाहत असतो. याच नाल्यातील पाणी हे पुढे जाऊन अंबा नदीला मिळते. अंबा नदीचे पाणी संपूर्ण पालीकरांना विनाशुध्दीकरण करता मिळते. यामुळे पालीकरांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. या नाल्यात टाकलेला कचरा हा रोजच्या रोज साफ न केल्याने हा कचरा कुजला आहे, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीस सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने हा कचरा रोजच्या रोज साफ करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. नाल्याशेजारी कचराकुंडी असावी, अशी मागणी आम्ही गेली कित्येक दिवस करीत आहोत. कचराकुंडी असल्यास ग्रामस्थ कचरा कुंडीत टाकतील व नाला तुंबणार नाही, परंतु ग्रामपंचायत आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.- चंद्रकांत आंबेकर, माजी सदस्य, ग्रामपंचायत पाली पावसाळ्यात तुंबणार नाला ?या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका असून पाली ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे नाला तुंबून मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.>नालेसफाईची मागणीपालीतील नाले व गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल, माती आणि विविध प्रकारचा कचरा साठला आहे. वेळीच तो साफकरण्यात आला नाही तर पावसाचे पाणी नाल्यात व गटारात तुंबून पूरसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.