शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दर्शन मार्गावरुन तुळजापुरात वादंग

By admin | Updated: September 2, 2016 22:14 IST

नवरात्रोत्सव काळात पुजाऱ्यांसह भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीयांतर्फे बंदचे आयोजन करण्यात आले आहे

- ऑनलाइन लोकमत
प्रशासनातर्फे बैठक : सर्वपक्षीयांतर्फे आज बंदची हाक
उस्मानाबाद, दि. 2 - सुरक्षेच्या कारणावरुन प्रशासनाने प्रवेश मार्गात बदल केला आहे. याला तुळजापूरकरांनी विरोध केला असून, नवरात्रोत्सव काळात पुजाऱ्यांसह भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीयांतर्फे बंदचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत शनिवारी सर्व संबंधितांची बैठक घेवून तोडगा काढावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
यात्रा कालावधीत महाद्वारासमोर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेवून प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरुन महाद्वाराऐवजी भाविकांना घाटशीळ मार्गे प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. तोच निर्णय याही वर्षी कायम ठेवण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. मात्र या बदलामुळे पारंपरिक परंपरा मोडीत निघत असल्याचे तसेच याचा फटका पुजाऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करीत, या निर्णयाविरोधात तुळजापूरकर एकत्रीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नवरात्रोत्सवात महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी प्रतिक रोचकरी व सागर इंगळे यांनी मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले असून, सर्वपक्षीयांतर्फे शनिवारी बंदचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. मागील वर्षी भाविकांची सुरक्षीतता लक्षात घेवून दर्शन मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळाले होते. तसेच यात्रोत्सव काळातही मंदिरासमोर कोंडी झाली नव्हती. मात्र याला काहींचा विरोध आहे. याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी शनिवारी मंदिराशी संबंधित असलेल्या सर्व संबंधितांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
भाविक आज विधीला मुकणार
श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी असते. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक तर दिवसभर गोंधळ, ओटीभरण आणि पाद्यपूजा चालत असते. मात्र पुजाऱ्यांसह गोंधळी लोकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मंदिराच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच भाविकांना या धार्मिक विधीपासून वंचित रहावे लागणार आहे. मंदिराच्या रितीरिवाजाप्रमाणे महंतातर्फे करण्यात येणारे अभिषेक, नैवेद्य, धूपारती आणि अंगारा हे विधी मात्र होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.