शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

दर्शन मार्गावरुन तुळजापुरात वादंग

By admin | Updated: September 2, 2016 22:14 IST

नवरात्रोत्सव काळात पुजाऱ्यांसह भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीयांतर्फे बंदचे आयोजन करण्यात आले आहे

- ऑनलाइन लोकमत
प्रशासनातर्फे बैठक : सर्वपक्षीयांतर्फे आज बंदची हाक
उस्मानाबाद, दि. 2 - सुरक्षेच्या कारणावरुन प्रशासनाने प्रवेश मार्गात बदल केला आहे. याला तुळजापूरकरांनी विरोध केला असून, नवरात्रोत्सव काळात पुजाऱ्यांसह भाविकांना महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीयांतर्फे बंदचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत शनिवारी सर्व संबंधितांची बैठक घेवून तोडगा काढावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
यात्रा कालावधीत महाद्वारासमोर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेवून प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरुन महाद्वाराऐवजी भाविकांना घाटशीळ मार्गे प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. तोच निर्णय याही वर्षी कायम ठेवण्याचे प्रशासनाचे धोरण आहे. मात्र या बदलामुळे पारंपरिक परंपरा मोडीत निघत असल्याचे तसेच याचा फटका पुजाऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करीत, या निर्णयाविरोधात तुळजापूरकर एकत्रीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नवरात्रोत्सवात महाद्वारातूनच प्रवेश द्यावा, या मागणीसाठी प्रतिक रोचकरी व सागर इंगळे यांनी मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले असून, सर्वपक्षीयांतर्फे शनिवारी बंदचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. मागील वर्षी भाविकांची सुरक्षीतता लक्षात घेवून दर्शन मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळाले होते. तसेच यात्रोत्सव काळातही मंदिरासमोर कोंडी झाली नव्हती. मात्र याला काहींचा विरोध आहे. याबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी शनिवारी मंदिराशी संबंधित असलेल्या सर्व संबंधितांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
भाविक आज विधीला मुकणार
श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी असते. सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक तर दिवसभर गोंधळ, ओटीभरण आणि पाद्यपूजा चालत असते. मात्र पुजाऱ्यांसह गोंधळी लोकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मंदिराच्या इतिहासात शनिवारी पहिल्यांदाच भाविकांना या धार्मिक विधीपासून वंचित रहावे लागणार आहे. मंदिराच्या रितीरिवाजाप्रमाणे महंतातर्फे करण्यात येणारे अभिषेक, नैवेद्य, धूपारती आणि अंगारा हे विधी मात्र होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.