शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोरोपंत नगरीत विसावले तुकोबाराय

By admin | Updated: June 27, 2014 22:37 IST

डोळ्य़ात दाटलेला भक्तीचा भाव आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ प्रत्येकाला वारीमध्ये चालण्याचे बळ देत आहे.

बारामती :
विठूचा गजर 
हरीनामाचा गजर 
ङोंडा रोवीला.. ङोंडा रोवीला 
असा डोळ्य़ात दाटलेला भक्तीचा भाव आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ प्रत्येकाला वारीमध्ये चालण्याचे बळ देत आहे. या आनंदमेळ्य़ात चालत असताना भक्तीरसात न्हालेले सारेच लहानथोर विठ्ठलाच्या ओढीने पंढरीची वाट चालताना दिसत आहेत. बारामतीमध्ये दाखल झालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्य़ात अकरा  वर्षाच्या लहान वारक:यापासून ते शंभरी पार केलेले वृध्द वारकरीही तेवढय़ाच भक्तीभावाने वारीची वाट आनंदाने चालत आहेत. ‘ बा.. विठ्ठला पाऊस पडू दे रान शिवार फुलू दे’ अशी मनात आस ठेवत हे वारकरी आपल्या भोळ्य़ा भक्तीने विठूरायाला साकडे घालीत आहेत. तसेच ‘जाता पंढरीशी सुख वाटे जीवा’ अशी भावनाही वारक:यांच्या चेह:यावर दिसत होती.  ‘लोकमत’शी बोलताना  अशाच काही भाववेडय़ा वारक:यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सायंकाळी पाटस मार्गावरील  पांढरीच्या महादेव मंदिराजवळ आगमन झाले.  श्री तुकोबांच्या पालखीचे स्वागत नगराध्यक्षा जयश्री सातव यांनी पुष्पहार घालून केले.  
उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, योगेश जगताप सुभाष ढोले,  किरण  गुजर, इम्तीयाज शिकिलकर  नगर पालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, उपसभापती, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, उपविभागीय अधिकारी  संतोष जाधव, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम,  मुख्याधिकारी रवी पवार, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, शासकीय अधिकारी, कर्मचारी,  विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरपालिकेचे  अधिकारी, कर्मचारी आदींनी पुष्पहार अर्पण करुन पालखीचे स्वागत केले. शहरातील शारदा प्रांगणात पालखी सोहळा सायंकाळी विसावला. यावेळी टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्र पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
नगरपालिका, विविध तरुण मंडळे व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या कडून पालखीतील वारक:यांना चहा-नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  नगरपालिकेने पालखीचा मुक्काम असलेल्या शारदा प्रांगण, वारक:यांच्या मुक्काम असलेल्या सांस्कृतिक भवन व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये तसेच शहरात पाणी, वीज व स्वच्छतेची व्यवस्था  केली होती.   वारक:यांना सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालय, रुई हॉस्पिटल, डॉक्टरांची प्रबोधिनी तसेच सेवाभावी संस्था यांच्यामार्फत रुग्ण सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालयाने खास वॉर्ड तयार केला होता.  तसेच 24 तास वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, आरोग्य पथके,  वैद्यकीय कर्मचारी पथक उपलब्ध करुन दिले होते. 
 पालखीचे  प्रस्थान झाल्यावर काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण होणार आहे.  पालखीचा पुढील मुक्काम सणसर येथे होणार आहे.  
 
इंदापूर तालुक्यातील वडाचामाळ येथील राहणारा आणि वारीमध्ये गेल्या दोन वर्षापासून चालणारा अमोल रामा वाघमोडे हा अकरा वर्षाचा वारकरी आपल्या घरातील वारीची परंपरा जोपासत आहे. त्याच्या बरोबर बारावीत शिकणारा चुलत भाऊ गंगाराम आणि बहिन काजलही या वारीमध्ये विठ्ठलाच्या ओढीने चालत आहेत. अमोल म्हणतो या वारीमध्ये चालताना आनंद तर होतोच परंतु प्रत्येक वर्षी वारी कधी येते असे देखील होते. गावाकडे पाऊस नाही त्यामुळे लवकर पाऊस पडू दे असे सारखे मी विठूरायाला विनवतो आहे. 
- अमोल रामा वाघमोडे 
 
4नगरपालिका, विविध तरुण मंडळे व विविध स्वयंसेवी संस्था यांच्या कडून पालखीतील वारक:यांना चहा-नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.  नगरपालिकेने पालखीचा मुक्काम असलेल्या शारदा प्रांगण, वारक:यांच्या मुक्काम असलेल्या सांस्कृतिक भवन व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये तसेच शहरात पाणी, वीज व स्वच्छतेची व्यवस्था  
केली होती.  
 
या वारीमध्ये इंदापूर तालुक्यातील  अकोले गावचे रहिवाशी असलेले मारूती तुकाराम दराडे यांना आपण वारीमध्ये कधीपासून चालत आहोत तेच आठवत नाही. ‘विठ्ठलाने मला आजर्पयत भरभरून दिले. कोणतीही अपेक्षा नाही, आता फक्त विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला जायचे. शंभरी गाठत आलो आता चालणो होत नाही. परंतु, विठ्ठल भक्तीची आस कायम आहे. पेटीमास्तर म्हणून भजनी मंडळामध्ये दहा वर्षाचा असल्यापासून जात होतो. तेंव्हा पासून वारीची गोडी लागली आहे. 
- मारुती तुकाराम दराडे
 
परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असणा:या हरीमहाराज राणोर गोविंदपूरवाडीकर यांनी तर शंभरी पार केली आहे. त्यांनी स्वत:चे वय 125 असल्याचा दावा केला आहे. ‘ऐवढे वय झाले तरी मी चालतच वारी करतो गाडीत बसत नाही. विठ्ठलाने माझं शरीर तेवढ तगडं ठेवल आहे. वारीत देव आसतू..’ असेही हे आजोबा आवजरुन सांगतात. स्वत: दिंडी चालक असलेले हरीमहाराज  ‘पंढरीसी जाताना सुख वाटते. वारीत देव भेटल्यातचा भास होतो’ असेही सांगतात.  
- हरीमहाराज राणोर गोविंदपूरवाडीकर 
 
सोरपतवाडी तालुका दौंड येथील रहिवाशी असणारा विनोद मागील दोन वर्षापासून वारीमध्ये चालत आहे. ‘वारीची परंपरा घरात आहे. आता वयामुळे आई-वडिलांना चालने होत नाही. मागच्या वर्षी घराण्याची परंपरा म्हणून एक औपचारिकता म्हणूनन आलो होतो. मात्र वारीची आता गोडी लागली आहे. त्यामुळे ही परंपरा आता कायम जोपसणार आहे.’ 
- विनोद मुळीक
 
दौंड तालुक्यातील पाटस येथे राहणा:या सीताबाई दत्तात्रय पागळे गेल्या दहा वर्षापासून वारीमध्ये चालत आहेत. ‘पाऊस लांबल्याने पेरण्या झाल्या नाहीत त्यामुळे चिंता वाटते मात्र विठ्ठल नक्कीच आमचं गा:हाण ऐकेल त्याला काही सांगायची गरज नाही. देवाला कधी काही सांगावही लागत नाही. पाऊस नक्की पडेल.’ अशी भोळी आशा घेऊन चालणा:या या आजींचा पालखीत चालण्याचा उत्साह मात्र अजिबात कमी होत नाही. - सीताबाई पागळे