शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
3
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
4
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
5
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
6
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
7
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
8
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
9
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
10
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
11
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
12
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
13
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
14
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
15
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
16
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
17
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
18
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
19
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
20
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

By admin | Updated: May 1, 2017 04:58 IST

राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने

रूपेश उत्तरवार / मुंबई/यवतमाळ राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने काढलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नसल्याने पणन विभागाचे अधिकारी गोंधळात आहेत.राज्यात २२ एप्रिलपर्यंत हमीभावाने ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. परंतु खरेदी केंद्रांवरील ८ लाख क्विंटल आणि शेतकऱ्यांकडील टोकण पद्धतीने नोंदणी झालेली ७ लाख क्विंटल, अशी एकूण १५ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. सरकार फक्त दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. तूरकोंडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी टोकणवरील सर्व तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, हस्तक्षेप योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नाही. त्यामुळे पणनचे अधिकारी फक्त खरेदी केंद्रावरील तूरीचे माप करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील तुरीचे काय होणार, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नोंदणी केलेल्या पण शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर असलेली तूर प्राधान्याने खरेदी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रात असलेली शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना तालुक्याबाहेरचे शेतकरी किंवा इतर ठिकाणचे शेतकरी असा भेद होणार नाही. मात्र ही तूर शेतकऱ्यांची आहे किंवा नाही हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या स्थितीत जागेचा प्रश्न भेडसावत आहे. केंद्रीय वखार महामंडळ आणि राज्य वखार महामंडळात तूर ठेवायला जागा नाही. यामुळे खरेदी झालेली तूर दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत इतरत्र हलविण्याच्या सूचना आता सहकार मंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे तूर ठेवण्याची पावती मिळताच शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या मदतीने चुकारे मिळणार आहेत.बारदान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला बारदाना खरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे बारदान्याच्या तुटवड्याने यापुढील काळात तूर खरेदी थांबणार नाही, याची खबरदारी सहकार विभागाने घेतली आहे.मोजमाप... नाफेडद्वारे तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यात आल्याने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप सुरु झाले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तुरीच्या पोत्यांचा असा खच पडलेला आहे.राज्यातील तूर इतरत्र हलविणार राज्य शासन १० लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. ही तूर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर राज्याकडे ती वळती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने इतर राज्यांचा शोध घेण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच खरेदी होणारी तूर इतरत्र हलविली जाणार आहे. नाफेडचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले४० लाख टन तुरीची खरेदी नाफेडने कली. या तुरीचे चुकारे अदा करण्याचे काम नाफेडची यंत्रणा करीत आहे. नाफेड २२ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देणार आहे. या यंत्रणेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले आहे. या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील  केंद्रांवर आलेली तूर प्राधान्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर टोकनवरील तूर शहानिशा करून खरेदी होणार आहे. - सुभाष देशमुख,सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री