शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

By admin | Updated: May 1, 2017 04:58 IST

राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने

रूपेश उत्तरवार / मुंबई/यवतमाळ राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने काढलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नसल्याने पणन विभागाचे अधिकारी गोंधळात आहेत.राज्यात २२ एप्रिलपर्यंत हमीभावाने ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. परंतु खरेदी केंद्रांवरील ८ लाख क्विंटल आणि शेतकऱ्यांकडील टोकण पद्धतीने नोंदणी झालेली ७ लाख क्विंटल, अशी एकूण १५ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. सरकार फक्त दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. तूरकोंडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी टोकणवरील सर्व तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, हस्तक्षेप योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नाही. त्यामुळे पणनचे अधिकारी फक्त खरेदी केंद्रावरील तूरीचे माप करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील तुरीचे काय होणार, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नोंदणी केलेल्या पण शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर असलेली तूर प्राधान्याने खरेदी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रात असलेली शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना तालुक्याबाहेरचे शेतकरी किंवा इतर ठिकाणचे शेतकरी असा भेद होणार नाही. मात्र ही तूर शेतकऱ्यांची आहे किंवा नाही हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या स्थितीत जागेचा प्रश्न भेडसावत आहे. केंद्रीय वखार महामंडळ आणि राज्य वखार महामंडळात तूर ठेवायला जागा नाही. यामुळे खरेदी झालेली तूर दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत इतरत्र हलविण्याच्या सूचना आता सहकार मंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे तूर ठेवण्याची पावती मिळताच शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या मदतीने चुकारे मिळणार आहेत.बारदान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला बारदाना खरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे बारदान्याच्या तुटवड्याने यापुढील काळात तूर खरेदी थांबणार नाही, याची खबरदारी सहकार विभागाने घेतली आहे.मोजमाप... नाफेडद्वारे तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यात आल्याने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप सुरु झाले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तुरीच्या पोत्यांचा असा खच पडलेला आहे.राज्यातील तूर इतरत्र हलविणार राज्य शासन १० लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. ही तूर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर राज्याकडे ती वळती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने इतर राज्यांचा शोध घेण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच खरेदी होणारी तूर इतरत्र हलविली जाणार आहे. नाफेडचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले४० लाख टन तुरीची खरेदी नाफेडने कली. या तुरीचे चुकारे अदा करण्याचे काम नाफेडची यंत्रणा करीत आहे. नाफेड २२ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देणार आहे. या यंत्रणेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले आहे. या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील  केंद्रांवर आलेली तूर प्राधान्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर टोकनवरील तूर शहानिशा करून खरेदी होणार आहे. - सुभाष देशमुख,सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री