शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

‘तूरकोंडी’त टोकणचा गोंधळ!

By admin | Updated: May 1, 2017 04:58 IST

राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने

रूपेश उत्तरवार / मुंबई/यवतमाळ राज्यात २२ एप्रिलपर्यंत टोकण पद्धतीने नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी सरकारने नव्याने काढलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नसल्याने पणन विभागाचे अधिकारी गोंधळात आहेत.राज्यात २२ एप्रिलपर्यंत हमीभावाने ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. परंतु खरेदी केंद्रांवरील ८ लाख क्विंटल आणि शेतकऱ्यांकडील टोकण पद्धतीने नोंदणी झालेली ७ लाख क्विंटल, अशी एकूण १५ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतिक्षेत आहे. सरकार फक्त दहा लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. तूरकोंडीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी टोकणवरील सर्व तूर खरेदी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, हस्तक्षेप योजनेतंर्गत काढण्यात आलेल्या खरेदी आदेशात ‘टोकण’चा उल्लेखच नाही. त्यामुळे पणनचे अधिकारी फक्त खरेदी केंद्रावरील तूरीचे माप करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील तुरीचे काय होणार, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नोंदणी केलेल्या पण शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या तुरीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर असलेली तूर प्राधान्याने खरेदी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रात असलेली शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना तालुक्याबाहेरचे शेतकरी किंवा इतर ठिकाणचे शेतकरी असा भेद होणार नाही. मात्र ही तूर शेतकऱ्यांची आहे किंवा नाही हे तपासले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्याच्या स्थितीत जागेचा प्रश्न भेडसावत आहे. केंद्रीय वखार महामंडळ आणि राज्य वखार महामंडळात तूर ठेवायला जागा नाही. यामुळे खरेदी झालेली तूर दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत इतरत्र हलविण्याच्या सूचना आता सहकार मंत्र्यांनी दिल्या आहेत. यामुळे तूर ठेवण्याची पावती मिळताच शेतकऱ्यांना आरटीजीएसच्या मदतीने चुकारे मिळणार आहेत.बारदान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला बारदाना खरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे बारदान्याच्या तुटवड्याने यापुढील काळात तूर खरेदी थांबणार नाही, याची खबरदारी सहकार विभागाने घेतली आहे.मोजमाप... नाफेडद्वारे तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यात आल्याने तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप सुरु झाले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तुरीच्या पोत्यांचा असा खच पडलेला आहे.राज्यातील तूर इतरत्र हलविणार राज्य शासन १० लाख क्विंटल तूर खरेदी करणार आहे. ही तूर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इतर राज्याकडे ती वळती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने इतर राज्यांचा शोध घेण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच खरेदी होणारी तूर इतरत्र हलविली जाणार आहे. नाफेडचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले४० लाख टन तुरीची खरेदी नाफेडने कली. या तुरीचे चुकारे अदा करण्याचे काम नाफेडची यंत्रणा करीत आहे. नाफेड २२ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देणार आहे. या यंत्रणेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे दोनशे कोटींचे चुकारे अडकले आहे. या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील  केंद्रांवर आलेली तूर प्राधान्याने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर टोकनवरील तूर शहानिशा करून खरेदी होणार आहे. - सुभाष देशमुख,सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री