शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

५०० जागा वाचविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: June 22, 2014 01:00 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेश क्षमता ५० व १०० असणाऱ्या

मेडिकल : पायाभूत सोयींसाठी वेळ मागणार नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेश क्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळणार होत्या. महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर यावर्षी प्रवेश मिळणार होते. परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १५ जुलैपूर्वी वाढलेल्या जागा मिळविण्यासाठी दोन खासदारांसोबतच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने आपल्या प्रयत्नाला वेग आणल्याची माहिती आहे. लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण वाढविण्यासाठी एमबीबीएसच्या जागेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील शासकीय कॉलेजांमध्ये ५०० जागा वाढणार होत्या. त्यादृष्टीने ५० व १०० जागा असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजांकडून तातडीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. सरकार पातळीवर असलेली दोन प्रमाणपत्रे आणि महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या संलग्नीकरणाच्या हमीपत्रासह हा प्रस्ताव एमसीआयकडे सादर करावयाचा होता. त्यानुसार नागपूर, सोलापूर, नांदेड, अकोला, लातूर, मीरज, कोल्हापूर, यवतमाळ, धुळे आणि अंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले. त्यामुळे गतवर्षी राज्यातील या १० महाविद्यालयांना प्रत्येकी ५० अशा ५०० जागा वाढवून मिळाल्या. एमसीआयने महाविद्यालयांना त्रुटीची पूर्तता करण्याच्या अटीवर या वाढीव जागांना मान्यता देण्यात आली होती. या अटींना घेऊन मे महिन्यात एमसीआयच्या चमूने या दहाही महाविद्यालयांचे निरीक्षण केले. याचा अहवाल अद्यापही आला नसला तरी अनेक महाविद्यालयांमध्ये त्रुटीची पूर्तताच झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जुन्याच २०६० जागांवरच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्य सरकारच्या उदासीनतेवर टीका होत आहे. याशिवाय वर्षभरात त्रुटी पूर्ण करणेही शक्य नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकार या जागांवर १५ जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे. त्यापूर्वी या जागा मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खा. नाना पटोले, खा. हंसराज अहिर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सचिव म्हैसकर आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी आपल्या प्रयत्नांना गती आणल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)