शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

५०० जागा वाचविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: June 22, 2014 01:00 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेश क्षमता ५० व १०० असणाऱ्या

मेडिकल : पायाभूत सोयींसाठी वेळ मागणार नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेश क्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळणार होत्या. महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर यावर्षी प्रवेश मिळणार होते. परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर यावर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. १५ जुलैपूर्वी वाढलेल्या जागा मिळविण्यासाठी दोन खासदारांसोबतच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने आपल्या प्रयत्नाला वेग आणल्याची माहिती आहे. लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण वाढविण्यासाठी एमबीबीएसच्या जागेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील शासकीय कॉलेजांमध्ये ५०० जागा वाढणार होत्या. त्यादृष्टीने ५० व १०० जागा असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजांकडून तातडीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. सरकार पातळीवर असलेली दोन प्रमाणपत्रे आणि महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या संलग्नीकरणाच्या हमीपत्रासह हा प्रस्ताव एमसीआयकडे सादर करावयाचा होता. त्यानुसार नागपूर, सोलापूर, नांदेड, अकोला, लातूर, मीरज, कोल्हापूर, यवतमाळ, धुळे आणि अंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर केले. त्यामुळे गतवर्षी राज्यातील या १० महाविद्यालयांना प्रत्येकी ५० अशा ५०० जागा वाढवून मिळाल्या. एमसीआयने महाविद्यालयांना त्रुटीची पूर्तता करण्याच्या अटीवर या वाढीव जागांना मान्यता देण्यात आली होती. या अटींना घेऊन मे महिन्यात एमसीआयच्या चमूने या दहाही महाविद्यालयांचे निरीक्षण केले. याचा अहवाल अद्यापही आला नसला तरी अनेक महाविद्यालयांमध्ये त्रुटीची पूर्तताच झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जुन्याच २०६० जागांवरच प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी राज्य सरकारच्या उदासीनतेवर टीका होत आहे. याशिवाय वर्षभरात त्रुटी पूर्ण करणेही शक्य नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकार या जागांवर १५ जुलैपर्यंत निर्णय घेणार आहे. त्यापूर्वी या जागा मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, खा. नाना पटोले, खा. हंसराज अहिर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सचिव म्हैसकर आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी आपल्या प्रयत्नांना गती आणल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)