शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करा

By admin | Updated: November 13, 2014 00:53 IST

सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रधान सचिवांकडून आढावा : अधिकाऱ्यांना निर्देशनागपूर : सिंचन प्रकल्पातील उपलब्ध जलसाठ्यातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर द्या,असे निर्देश जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात बुधवारी गोसेखुर्द आणि निम्न वर्धा प्रकल्पाच्या कामाचा आढावा मालिनी शंकर यांनी घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, वर्धेचे जिल्हाधिकारी एन.नवीन सोना, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक शुक्ला, महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.पूर्व विदर्भात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी गोसेखुर्द आणि निम्न वर्धा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि प्रकल्पाचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल, यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे; तसेच शासनाकडून प्राप्त निधी वेळेत खर्च होईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मालिनी शंकर यांनी दिल्या. शेतीसाठी पाणी सोडताना प्रकल्पातील जलसाठा आणि पाऊस याचे वेळापत्रक याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी व त्यासाठी संपर्क यंत्रणा अद्ययावत करावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गोसेखुर्दचे काम पूर्णगोसेखुर्द प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात पूर्णपणे पाणी साठवणूक करता येईल, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी सांगितले. प्रकल्पाची सिंचन क्षमता २,५०,८०० हेक्टर आहे तर, पाणी साठवणूक क्षमता ४४.७० टीएमसी एवढी आहे. धरणासाठी भूसंपादनाचे आणि पुनर्वसनाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे अनुप कुमार म्हणाले.६४१ कोटींचे वाटपपर्यायी शेतजमिनीऐवजी रोख रक्कम, पुनर्वसन, गुरांचा गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत, नोकरीऐवजी एकमुस्त रक्कम आणि इतरही कामासाठी ११९९ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज शासनाने जाहीर केले होते. बुधवारच्या बैठकीत पॅकेजचाही आढावा घेण्यात आला. प्राप्त रकमेतून ६४१ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)