शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

‘कायद्याचे खरे नायक वाळीतग्रस्तच’

By admin | Updated: April 15, 2016 02:12 IST

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात

- जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेकडो वाळीतग्रस्तांचेच आहे. न्यायासाठी त्या प्रक्रियेची चक्रे फिरवणाऱ्यांचे ते श्रेय असते आणि येथे ही चक्रे फिरवणारे वाळीतग्रस्तच आहेत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया या कायद्याचे प्रारूप तयार करणारे मानवी हक्क क्षेत्रातील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.संतोष जाधव सामाजिक बहिष्कार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, खंडपीठाने सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबत राज्याच्या पोलीस विभागास दिलेल्या मार्गदर्शक सूचना व त्यांची तत्काळ अंमबजावणी हा या कायदा निर्मिती प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक पहिला टप्पा ठरला आणि वाळीतग्रस्तांना मोठा आशेचा किरण सर्वप्रथम दिसला. त्यातून वाळीतग्रस्त पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी दाखल करू लागले, असे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.या कायदा निर्मितीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेचा विचार करून या कायद्याचे प्रारूप तयार केले. ते शासन आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खान यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे प्रारूप सादर करण्याची संधी दिली, असेही अ‍ॅड. सरोदे यांनी नमूद केले.