शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

मोदी सरकारची खरी जबाबदारी शांतता जपण्याची

By admin | Updated: February 2, 2016 04:13 IST

केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून

सांगली : केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून, ती सरकारने सर्वप्रथम पार पाडली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत दोन प्रवाहांतील कट्टरवाद्यांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्त कुलकर्णी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने आतापर्यंत चांगली कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. विद्यमान सरकारने जगभरात स्वत:ची प्रतिमा उंचावण्यास सुरुवात केली आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरी, देशात निर्माण होत असलेले गढूळ वातावरण हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे देशातील शांतता, सौहार्दतेचे वातावरण कायम राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती ओळखली नाही, तर जगासमोर जाऊन आपण काम करू शकणार नाही. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वेगवेगळे प्रवाह कार्यरत आहेत. एका प्रवाहाकडून समाज सुधारणेची परंपरा जपण्यात येत आहे. या भूमिकेचे स्वागत करायला हवे. संघाचे मुस्लिमांबद्दलचे धोरणही काही प्रमाणात बदलत आहे. मात्र, याचवेळी संघातील कट्टरतावादी प्रवाहापासून सतर्क राहणे आवश्यक आहे. जे चुकीचे असेल, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत-पाकिस्तान संबंधाबाबत ते म्हणाले की, दोन्ही देशांतील प्रश्न वाटाघाटीने सुटण्यासारखे आहेत. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून पुढाकार व प्रतिसाद असल्याने याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पाकिस्तानमधील नागरिकांनाही भारताशी मैत्रीचे संबंध राखण्यात स्वारस्य आहे. केवळ मोदी सरकारनेच नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. (प्रतिनिधी)