शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची खरी जबाबदारी शांतता जपण्याची

By admin | Updated: February 2, 2016 04:13 IST

केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून

सांगली : केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून, ती सरकारने सर्वप्रथम पार पाडली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत दोन प्रवाहांतील कट्टरवाद्यांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्त कुलकर्णी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने आतापर्यंत चांगली कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. विद्यमान सरकारने जगभरात स्वत:ची प्रतिमा उंचावण्यास सुरुवात केली आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरी, देशात निर्माण होत असलेले गढूळ वातावरण हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे देशातील शांतता, सौहार्दतेचे वातावरण कायम राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती ओळखली नाही, तर जगासमोर जाऊन आपण काम करू शकणार नाही. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वेगवेगळे प्रवाह कार्यरत आहेत. एका प्रवाहाकडून समाज सुधारणेची परंपरा जपण्यात येत आहे. या भूमिकेचे स्वागत करायला हवे. संघाचे मुस्लिमांबद्दलचे धोरणही काही प्रमाणात बदलत आहे. मात्र, याचवेळी संघातील कट्टरतावादी प्रवाहापासून सतर्क राहणे आवश्यक आहे. जे चुकीचे असेल, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत-पाकिस्तान संबंधाबाबत ते म्हणाले की, दोन्ही देशांतील प्रश्न वाटाघाटीने सुटण्यासारखे आहेत. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून पुढाकार व प्रतिसाद असल्याने याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पाकिस्तानमधील नागरिकांनाही भारताशी मैत्रीचे संबंध राखण्यात स्वारस्य आहे. केवळ मोदी सरकारनेच नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. (प्रतिनिधी)