शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

मोदी सरकारची खरी जबाबदारी शांतता जपण्याची

By admin | Updated: February 2, 2016 04:13 IST

केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून

सांगली : केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून, ती सरकारने सर्वप्रथम पार पाडली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत दोन प्रवाहांतील कट्टरवाद्यांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्त कुलकर्णी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने आतापर्यंत चांगली कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. विद्यमान सरकारने जगभरात स्वत:ची प्रतिमा उंचावण्यास सुरुवात केली आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरी, देशात निर्माण होत असलेले गढूळ वातावरण हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे देशातील शांतता, सौहार्दतेचे वातावरण कायम राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती ओळखली नाही, तर जगासमोर जाऊन आपण काम करू शकणार नाही. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वेगवेगळे प्रवाह कार्यरत आहेत. एका प्रवाहाकडून समाज सुधारणेची परंपरा जपण्यात येत आहे. या भूमिकेचे स्वागत करायला हवे. संघाचे मुस्लिमांबद्दलचे धोरणही काही प्रमाणात बदलत आहे. मात्र, याचवेळी संघातील कट्टरतावादी प्रवाहापासून सतर्क राहणे आवश्यक आहे. जे चुकीचे असेल, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत-पाकिस्तान संबंधाबाबत ते म्हणाले की, दोन्ही देशांतील प्रश्न वाटाघाटीने सुटण्यासारखे आहेत. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून पुढाकार व प्रतिसाद असल्याने याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पाकिस्तानमधील नागरिकांनाही भारताशी मैत्रीचे संबंध राखण्यात स्वारस्य आहे. केवळ मोदी सरकारनेच नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. (प्रतिनिधी)