शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

भाजपचे खरे रुप जनतेसमोर : दलवाई

By admin | Updated: November 6, 2014 22:00 IST

काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला

चिपळूण : सर्वसामान्यांचे सरकार असा कांगावा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचे खरे रुप देशातील जनतेसमोर हळूहळू येऊ लागले आहे. एकूणच कारभार पाहता हे सरकार भांडवलदारांचे, उद्योगपतींचे असल्याचे लक्षात आले, असे मत राज्य सभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे खासदार दलवाई बुधवारी चिपळूण येथे आले होते. त्यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. दलवाई यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. सरकारविरोधी दुहेरी लढा देण्याची गरज आहे. त्यासह पक्षाकडून निश्चित ताकद, बळ देण्यात येईल, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकारने गोरगरिबांकरिता असणाऱ्या हितकारक योजना बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे. अन्नसुरक्षा कायद्यासारखी सर्वसामान्यांच्या हक्काची योजना हे सरकार बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सरकार समाजात मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचे काम करीत आहे. भाजपचे खरे स्वरुप हळूहळू पुढे येत आहे. जनतेला आपल्या हक्कासाठी आता जागृत होऊन आंदोलन करावे लागेल. जनता मैदानात उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे दलवाई यांनी सांगितले. यावेळी दापोलीचे मधुकर दळवी, खेडचे अनंत जाधव, गुहागरचे रमाकांत बेलवलकर, चिपळूणचे संदीप सावंत, रामदास राणे, अशोक जाधव, अ‍ॅड. शांताराम बुरटे, सुधीर दाभोळकर, जीवन रेळेकर, लक्ष्मण खेतले, रणजित डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. आम्ही सर्व तालुक्यात तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, तर तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होणार आहोत. या हत्याकांडातील दोषींना शिक्षा व्हायला हवी, असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.