शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे खरे रुप जनतेसमोर : दलवाई

By admin | Updated: November 6, 2014 22:00 IST

काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला

चिपळूण : सर्वसामान्यांचे सरकार असा कांगावा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचे खरे रुप देशातील जनतेसमोर हळूहळू येऊ लागले आहे. एकूणच कारभार पाहता हे सरकार भांडवलदारांचे, उद्योगपतींचे असल्याचे लक्षात आले, असे मत राज्य सभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे खासदार दलवाई बुधवारी चिपळूण येथे आले होते. त्यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. दलवाई यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. सरकारविरोधी दुहेरी लढा देण्याची गरज आहे. त्यासह पक्षाकडून निश्चित ताकद, बळ देण्यात येईल, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकारने गोरगरिबांकरिता असणाऱ्या हितकारक योजना बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे. अन्नसुरक्षा कायद्यासारखी सर्वसामान्यांच्या हक्काची योजना हे सरकार बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सरकार समाजात मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचे काम करीत आहे. भाजपचे खरे स्वरुप हळूहळू पुढे येत आहे. जनतेला आपल्या हक्कासाठी आता जागृत होऊन आंदोलन करावे लागेल. जनता मैदानात उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे दलवाई यांनी सांगितले. यावेळी दापोलीचे मधुकर दळवी, खेडचे अनंत जाधव, गुहागरचे रमाकांत बेलवलकर, चिपळूणचे संदीप सावंत, रामदास राणे, अशोक जाधव, अ‍ॅड. शांताराम बुरटे, सुधीर दाभोळकर, जीवन रेळेकर, लक्ष्मण खेतले, रणजित डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. आम्ही सर्व तालुक्यात तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, तर तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होणार आहोत. या हत्याकांडातील दोषींना शिक्षा व्हायला हवी, असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.