शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

त्रास फक्त गरिबांनाच

By admin | Updated: November 16, 2016 05:51 IST

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या,

मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या, ललित मोदींसारखे लोक परदेशात निघून गेले, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भिवंडी कोर्टात हजर राहाण्यासाठी मुंबईत आलेले राहुल यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजप नेत्यांना अगोदरच दिली होती. तसे नसते तर पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझीट कसे केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.काँग्रेस पक्ष काळ्यापैशाविरोधात आहे. मोदींनी निर्णय घेतला त्याला आमची हरकत नाही. मात्र निर्णय घेण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक होते, असे सांगून ते म्हणाले नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत होते आणि नंतरच्या गोव्यातील भाषणात मात्र रडत होते. नोटांसाठी लागलेल्या रांगांमध्ये आजवर १८ लोक मेले. त्यामुळे मोदींनी हसायचे की रडायचे हे आधी ठरवावे, असा टोलाही राहुल यांनी लगावला. मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. त्यामुळेच मी त्यांच्या मातोश्री पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असे सांगून राहुल म्हणाले, नोटाबंदीचा त्रास गरीबांनाच होत आहे. काळा पैसा बाळगणारा एकही मोठा मासा बँकांच्या रांगेत कुठेही दिसला नाही. नोटाबंदीचा निर्णय घेताना अर्थमंत्री अरुण जेटली यांना अंधारात ठेवण्यात आले. सर्वसामान्य जनतेला आर्थिक खाईत लोटणारा निर्णय घेऊन सरकारने काय साधले, असा सवालही राहुल यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)