शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

त्रास फक्त गरिबांनाच

By admin | Updated: November 16, 2016 05:51 IST

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या,

मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या, ललित मोदींसारखे लोक परदेशात निघून गेले, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भिवंडी कोर्टात हजर राहाण्यासाठी मुंबईत आलेले राहुल यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजप नेत्यांना अगोदरच दिली होती. तसे नसते तर पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझीट कसे केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.काँग्रेस पक्ष काळ्यापैशाविरोधात आहे. मोदींनी निर्णय घेतला त्याला आमची हरकत नाही. मात्र निर्णय घेण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक होते, असे सांगून ते म्हणाले नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत होते आणि नंतरच्या गोव्यातील भाषणात मात्र रडत होते. नोटांसाठी लागलेल्या रांगांमध्ये आजवर १८ लोक मेले. त्यामुळे मोदींनी हसायचे की रडायचे हे आधी ठरवावे, असा टोलाही राहुल यांनी लगावला. मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. त्यामुळेच मी त्यांच्या मातोश्री पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असे सांगून राहुल म्हणाले, नोटाबंदीचा त्रास गरीबांनाच होत आहे. काळा पैसा बाळगणारा एकही मोठा मासा बँकांच्या रांगेत कुठेही दिसला नाही. नोटाबंदीचा निर्णय घेताना अर्थमंत्री अरुण जेटली यांना अंधारात ठेवण्यात आले. सर्वसामान्य जनतेला आर्थिक खाईत लोटणारा निर्णय घेऊन सरकारने काय साधले, असा सवालही राहुल यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)