शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

एनओसी रोखल्याने हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

By admin | Updated: March 21, 2016 03:27 IST

अर्हताप्राप्त शिक्षकांविना शिक्षण महाविद्यालय चालविणाऱ्या संस्थाचालकांवर बडगा उगारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन

जितेंद्र ढवळे, नागपूरअर्हताप्राप्त शिक्षकांविना शिक्षण महाविद्यालय चालविणाऱ्या संस्थाचालकांवर बडगा उगारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन ( एनसीईटी) एनसीईटीच्या निर्देशानुसार अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षण महाविद्यालयांनाच ना हरकत प्रमाणपत्र मिळेल, अशी भूमिका उच्च शिक्षण संचालकांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १५३ शिक्षण महाविद्यालयांच्या प्रवेशाला ग्रहण लागले आहे. या महाविद्यालयांना एनओसी नाकारली तर यंदा हजारो बी.एड., एम.एड., बी.पी.एड. आणि एम.पी.एड. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता आहे. २१ आॅगस्ट २०१५ रोजी उच्च शिक्षण विभागाने राज्यभरातील विद्यापीठांना पत्र पाठवित शिक्षण महाविद्यालयांना संलग्नीकरण प्रदान करण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयांनी एनसीईटीच्या निर्देशानुसार अटी पूर्ण केल्या की नाही, याबाबत राज्य सरकारची एनओसी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मात्र दरम्यानच्या काळात विद्यापीठाने सीईटी असल्याने काही शिक्षण महाविद्यालयांना संलग्नीकरणाचे पत्रही दिले. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार एनओसी देण्यासंदर्भात महाविद्यालयांची चौकशी समित्यांकडून पाहणीही करण्यात आली. याबाबतचा अहवाल विद्यापीठाने शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र शिक्षण संचालकांच्या पत्रानंतर विद्यापीठाच्या महाविद्यालय शाखेने हा विषय कुलगुरू कार्यालयाकडे पाठवित मार्गदर्शन घेत अशा महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांसंदर्भात कोणती भूमिका घ्यावयाची याबाबत अभिप्राय मागविला होता. मात्र आठ महिने होऊनही शिक्षण संचालकांनी महाविद्यालयाला ना-हरकरत प्रमाणपत्र प्रदान केले नाही. उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी पुन्हा शिक्षण महाविद्यालयांना एनीओसी देण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र पाठविले आहे. यात पाच प्रश्नांची माहिती मागविली आहे. त्यामुळे एकच एक माहिती शिक्षण संचालक मागत असल्याने विद्यापीठ प्रशासनही त्रस्त झाले आहे.