शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

‘ट्रिपल आयटी’च्या जागेचे ग्रहण सुटणार

By admin | Updated: July 16, 2014 01:15 IST

दीड वर्षांपूर्वी घोषित झालेल्या ‘ट्रिपल आयटी’च्या (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)जागेला लागलेले ग्रहण लवकरच सुटण्याची चिन्हे दिसून येत आहे. उपराजधानीच्या विद्यार्थ्यांसाठी

वर्धा मार्गावर १०० एकर जागेचा शोध : या आठवड्यात येणार केंद्र शासनाचे पथकनागपूर : दीड वर्षांपूर्वी घोषित झालेल्या ‘ट्रिपल आयटी’च्या (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)जागेला लागलेले ग्रहण लवकरच सुटण्याची चिन्हे दिसून येत आहे. उपराजधानीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या या संस्थेसाठी आतापर्यंत दोन जागांना नकार मिळाला आहे. परंतु वर्धा मार्गावरील पांजरी येथील जागा ही सर्वतऱ्हेने योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, या जागेलाच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी याच आठवड्यात केंद्र शासनाची चमू येणार असल्याची माहिती ‘डीटीई’कडून (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) देण्यात आली आहे.विदर्भातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी, याकरिता राज्य शासनाने २०१२ साली नागपूरमध्ये ‘ट्रिपल आयटी’स्थापन करण्याची घोषणा केली. परंतु दीड वर्षांनंतर स्थापना प्रक्रियेच्या गाडीने अजूनही वेग घेतलेला नाही. ‘ट्रिपल आयटी’ नेमके कुठे उभारण्यात येईल, याबद्दल अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व उद्योगजगतातील मोठ्या कंपन्यांच्या सहकार्यातून ‘ट्रिपल आयटी’ उभारण्यात येणार आहे. यात केंद्राचा वाटा सर्वात जास्त असणार आहे. परंतु जागा देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाकडे आहे. ‘ट्रिपल आयटी’साठी जवळपास ५० एकर जागेची आवश्यकता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याअगोदर नागपुरातील दोन जागांची पाहणी केली होती. यात वर्धा रोड येथील कालडोंगरी येथील १०० एकर जागा व चिंचोली येथील ४० एकर जागेचा यात समावेश होता. परंतु कें द्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या पथकाने ही दोन्ही ठिकाणे अयोग्य असल्याचा निर्वाळा देत, या जागांना नकार दिला होता.त्यानंतर वर्धा मार्गावरीलच पांजरी येथील जागा जवळपास १०० एकरच्या जागेचा शोध घेण्यात आला आहे. ही जागा मुख्य रस्त्याजवळच असून ‘ट्रिपल आयटी’साठी योग्य ठिकाण आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार या जागेची पाहणी व अभ्यास करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे पथक या आठवड्यात येणार आहे. या पथकाने पाहणी केल्यानंतर अंतिम जागेसंदर्भात निर्णय होऊ शकेल, अशी माहिती ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा अडली कुठे? दरम्यान, उपराजधानीत येणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा अंतिम झाली असली तरी, याचा ताबा अद्याप ‘डीटीई’कडे आलेला नाही. आॅटोमोटिव्ह चौकाजवळील या जागेचा दर २०१२ साली सुमारे २० कोटी ६० लाख रुपये होता. या जागेच्या दरासंदर्भात नगरविकास खात्याची अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळाल्यावर या जागेसंदर्भात पुढील प्रक्रिया करता येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. २०१५-१६ या वर्षात हे महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)