शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली

By admin | Updated: January 19, 2017 03:50 IST

प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता.

डोंबिवली : प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता. त्याला येत्या शनिवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळात राज्यकर्ते, प्रदूषण मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी काहीही न केल्याने निवासी भागातील नागरिक हा दिवस निषेध दिन म्हणून पाळणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित सरकारी यंत्रणांकडून कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात आलेले नसल्याने २१ जानेवारीला ढिम्म सरकारी यंत्रणाना श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे. डोंबिवली औद्योगिक निवासी परिसरात राहणारे जागरुक नागरिक राजू नलावडे २१ जानेवारी २०१४ ला मॉनिंग वॉकला निघाले, तेव्हा त्यांना सर्वत्र हिरवा पाऊस पडल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मित्र निखील भोईर याने तर एमआयडीसीत सर्वत्र हिरवा पाऊस पडल्याचे त्यांना कळवले. या परिसरात असलेल्या कापड प्रक्रिया उद्योगातून रासायनिक प्रक्रियेच्या वेळी चिमणीवाटे प्रचंड प्रमाणात रासायनिक कण बाहेर पडले. त्यांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यात दव आणि आकस्मिक पावसाचे पाणी मिसळल्याने सारा परिसर हिरवा झाला. त्यातून डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सर्व राजकीय पक्षांना जाग आली. त्यांनी भरपूर घोषणा केल्या. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. चिखलफेक केली. पण हा प्रश्न लावून धरला नाही. पाठपुरावा केला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधी सारवासारव केली आणि नंतर कारवाई केली. हिरवा पाऊस नेमका कशामुळे पडला, त्याला कोणती कंपनी जबाबदार होती, याचा शोध घेत ओंकार रंग कंपनीवर मंडळाने कारवाई केली आणि ती कंपनी बंद केली. ती आजतागायत बंदच आहे. हिरवा पाऊस पडला, तेव्हा त्यावेळी लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले होते. सत्ताधारी शिवसेनेची डीएनसी मैदानात प्रचार सभा होती. तिला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी हिरव्या पावसाचा उल्लेख प्रचारसभेत करीत डोंबिवली प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या तीन वर्षात शिवसेनेकडून त्याची पूर्तता झालेली नाही. केंद्राच्या-राज्याच्या सत्तेत शिवसेना आली. महापालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी भेट देऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते व पर्यावरण खात्याचे मंत्री रामदास कदम यांनी अचानक भेट देऊन यंत्रणेची गाळण उडविली. पण पुढे सूत्रे हलविली जायला हवी होती, तशी ती ती अद्याप हलविली गेलेली नाहीत. सत्ता बदलते. आश्वासने हवेत विरुन जातात. मंत्री येतात. पाहणी करुन जातात. प्रदूषणाचा प्रश्न तसाच राहतो, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)>प्रदूषण रोखण्यातील अपयशाच्या जागृतीसाठीच कार्यक्रम प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याचा मुद्दा आदी न्यायालयात आणि आता हरित लवादापुढे आहे. त्यातून डोंबिवली, अंबरनाथचे कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कं पन्यांनी प्रक्रिया न करात सांडपाणी सोडायचे नाही, असा निर्णय आहे. अनेक कंपन्यांत पाण्याचा वापर करून छुपे उत्पादन सुरुच आहे. कंपन्या बंदच्या नोटिशीनंतरही रामचंद्रनगरला नाल्यातून रासायनिक सांडपाण्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास झाला. वायूगळतीचाही प्रकार घडला होता. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाने बंद असतानाही प्रदूषणाची तक्रार हा नागरिकांकडून बाऊ सुरु असल्याचे सांगितल्याने नवा वाद उद््भवला. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस व कायमस्वरुपी उपाययोजना व प्रयत्न होणार नसतील, तर हिरव्या पावसापेक्षाही भयाण घटनेची पुनरावृत्ती डोंबिवलीत होण्याची भीती आहे. त्यासाठीच हिरव्या पावसाच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त निषेधदिन साजरा करुन निष्क्रीय सरकारी यंत्रणांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम नागरिक करणार नलावडे यांनी सांगितले.