शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

हिरव्या पावसाला डोंबिवलीत शनिवारी श्रद्धांजली

By admin | Updated: January 19, 2017 03:50 IST

प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता.

डोंबिवली : प्रदूषणामुळे गाजणाऱ्या डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी २१ जानेवारीला हिरवा पाऊस पडला होता. त्याला येत्या शनिवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळात राज्यकर्ते, प्रदूषण मंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी काहीही न केल्याने निवासी भागातील नागरिक हा दिवस निषेध दिन म्हणून पाळणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित सरकारी यंत्रणांकडून कोणतेही ठोस प्रयत्न करण्यात आलेले नसल्याने २१ जानेवारीला ढिम्म सरकारी यंत्रणाना श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे. डोंबिवली औद्योगिक निवासी परिसरात राहणारे जागरुक नागरिक राजू नलावडे २१ जानेवारी २०१४ ला मॉनिंग वॉकला निघाले, तेव्हा त्यांना सर्वत्र हिरवा पाऊस पडल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मित्र निखील भोईर याने तर एमआयडीसीत सर्वत्र हिरवा पाऊस पडल्याचे त्यांना कळवले. या परिसरात असलेल्या कापड प्रक्रिया उद्योगातून रासायनिक प्रक्रियेच्या वेळी चिमणीवाटे प्रचंड प्रमाणात रासायनिक कण बाहेर पडले. त्यांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यात दव आणि आकस्मिक पावसाचे पाणी मिसळल्याने सारा परिसर हिरवा झाला. त्यातून डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सर्व राजकीय पक्षांना जाग आली. त्यांनी भरपूर घोषणा केल्या. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. चिखलफेक केली. पण हा प्रश्न लावून धरला नाही. पाठपुरावा केला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधी सारवासारव केली आणि नंतर कारवाई केली. हिरवा पाऊस नेमका कशामुळे पडला, त्याला कोणती कंपनी जबाबदार होती, याचा शोध घेत ओंकार रंग कंपनीवर मंडळाने कारवाई केली आणि ती कंपनी बंद केली. ती आजतागायत बंदच आहे. हिरवा पाऊस पडला, तेव्हा त्यावेळी लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले होते. सत्ताधारी शिवसेनेची डीएनसी मैदानात प्रचार सभा होती. तिला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी हिरव्या पावसाचा उल्लेख प्रचारसभेत करीत डोंबिवली प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या तीन वर्षात शिवसेनेकडून त्याची पूर्तता झालेली नाही. केंद्राच्या-राज्याच्या सत्तेत शिवसेना आली. महापालिकेत गेल्या २० वर्षापासून शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी भेट देऊन प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते व पर्यावरण खात्याचे मंत्री रामदास कदम यांनी अचानक भेट देऊन यंत्रणेची गाळण उडविली. पण पुढे सूत्रे हलविली जायला हवी होती, तशी ती ती अद्याप हलविली गेलेली नाहीत. सत्ता बदलते. आश्वासने हवेत विरुन जातात. मंत्री येतात. पाहणी करुन जातात. प्रदूषणाचा प्रश्न तसाच राहतो, याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)>प्रदूषण रोखण्यातील अपयशाच्या जागृतीसाठीच कार्यक्रम प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याचा मुद्दा आदी न्यायालयात आणि आता हरित लवादापुढे आहे. त्यातून डोंबिवली, अंबरनाथचे कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कं पन्यांनी प्रक्रिया न करात सांडपाणी सोडायचे नाही, असा निर्णय आहे. अनेक कंपन्यांत पाण्याचा वापर करून छुपे उत्पादन सुरुच आहे. कंपन्या बंदच्या नोटिशीनंतरही रामचंद्रनगरला नाल्यातून रासायनिक सांडपाण्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास झाला. वायूगळतीचाही प्रकार घडला होता. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाने बंद असतानाही प्रदूषणाची तक्रार हा नागरिकांकडून बाऊ सुरु असल्याचे सांगितल्याने नवा वाद उद््भवला. प्रदूषण रोखण्यासाठी ठोस व कायमस्वरुपी उपाययोजना व प्रयत्न होणार नसतील, तर हिरव्या पावसापेक्षाही भयाण घटनेची पुनरावृत्ती डोंबिवलीत होण्याची भीती आहे. त्यासाठीच हिरव्या पावसाच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त निषेधदिन साजरा करुन निष्क्रीय सरकारी यंत्रणांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम नागरिक करणार नलावडे यांनी सांगितले.