शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

जिल्ह्यात आदिवासींचे ‘रवाळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 03:11 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण पालघर जिल्ह्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी विभाजनाच्या दोन वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न समस्या आणि दुरवस्था जैसे थे

पालघर : ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण पालघर जिल्ह्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली असली तरी विभाजनाच्या दोन वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न समस्या आणि दुरवस्था जैसे थे असल्याने आता आदिवासींचे देव तरी सरकारला सुबुद्धी देऊन हे प्रश्न समस्या सोडवतील अशी उपहासात्मक भूमिका घेऊन संघटनेन जिल्ह्यतील पालघर, जव्हार, वाडा, विक्र मगड, मोखाडा आण िवसईच्या तहसील कार्यालांसमोर आदिवासींच्या पारंपरिक ‘रवाळ’ कार्यक्र म करून देवांचे जागरण घातले.जव्हार, मोखाडा, विक्र मगड ,डहाणू , तलासरी या भागातील आदिवासी अत्यंत हलाखीचे आणि वंचित जीवन जगतोय आणि त्याला जर विकासाचा प्रवाहात आणायचे असेल तर या आदिवासी बहुल भागाला एका स्वतंत्र अशा आदिवासी जिल्ह्याचा दर्जा द्यावा लागेल अशी मागणी गेली अनेक वर्षे होती. दोन वर्षापूर्वी जिल्हा निर्माण केला मात्र आजही हे विभाजन फक्त नावापुरताच आहे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले कुपोषण, बेरोजगारी ,स्थलांतर यासारखे गंभीर प्रश्न आजही प्रलंबित असल्याचा आरोप करत श्रमजीवीने पालघर मध्ये संताप व्यक्त केला. येथील आदिवासींचे जीवन आज आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे झाले असल्याची खंत यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याचे विभाजन केले मात्र आजही येथे ३७ वेग वेगळ्या प्रकारची शासकीय विभागाची कार्यालय निर्माण झालेली नाहीत. अतिमहत्वाच्या असलेल्या आरोग्य विभागासह अनेक विभागाची पदं रिक्त आहेत. या आंदोलनात श्रमजीवीचे केशव नानकर, रामभाऊ वारणा , सुरेश रेन्जड या वरिष्ठ पदाधिकार्यांनी स्वत: आदिवासींचा पारंपारिक पोशाख करून रवाळ करताना सहभाग घेतला. विजय जाधव,उल्हास भानुशाली, सरिता जाधव, प्रवीण पाटील, राजेश राउत, कैलास तुम्बडा,पांडू मालक यासंह सुमारे ७ ते ८ हजार कार्यकर्ते सभासदांनी जिल्हाभरात आंदोलन केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न समस्यांना आकडेवारीसह तपशील असलेले निवेदन प्रत्येक तहसिलदारामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली. शक्य तेथे सहकार्य आणि आवश्यक तेथेच संघर्ष या भूमिकेत काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेने रोजगार हमी, कुपोषणासारख्या प्रश्नावर प्रशासनाच्या सोबतीला प्रत्यक्ष कामही केले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी स्पेशल टीम तयार करून प्रश्नाला प्रभावी काम करण्यात मदत केली.