शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

‘बारवी’तील आदिवासी मदतीपासून वंचित

By admin | Updated: April 3, 2017 06:08 IST

बारवी धरणाची उंची वाढवल्याने गेल्या वर्षी शेकडो कुटुंबे बेघर झाली.

मुरबाड : बारवी धरणाची उंची वाढवल्याने गेल्या वर्षी शेकडो कुटुंबे बेघर झाली. या पीडित कुटुंबांना मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन कोटी रुपये दिले. परंतु, एमआयडीसीने पीडितांना मदत न दिल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने धरणातील पाण्याच्या साठ्याची क्षमता वाढवण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढवली. गेल्या वर्षी पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे तोंडली, काचकोळी, जांभूळवाडा, मारगवाडी, बुरूडवाडी, देववाडी या वाड्या पाण्याखाली गेल्याने आदिवासींना घर सोडून जावे लागले. विस्थापित झालेल्या पीडित कुटुंबांना मदत मिळावी. त्यांना मूलभूत गरजा मिळाव्यात, म्हणून मुख्यमंत्री निधीतून सुमारे दोन कोटी देण्यात आले. त्या वेळी त्यांना तत्काळ मदत म्हणून १० हजार आणि धान्यही दिले. ज्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांना प्रत्येक कुटुंबामागे एक ते दीड लाख भरपाई देण्यात आली. एमआयडीसीने पीडित आदिवासी कुटुंबांना रोख मदत किंवा नुकसानभरपाई न देता ती इतर राज्यांत १० वर्षांपासून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना दिली. परंतु, पीडित आदिवासी कुटुंबे मदतीपासून वंचित आहेत.या पीडित कुटंबांपैकी श्रीमंतांना बारवी प्रशासनाने मुरबाडमधील सोसायट्यांमध्ये स्थलांतरित केले. त्यांचे भाडेही तेच भरत आहेत. खरोखर बेघर होऊन विस्थापित झालेल्या आदिवासींना स्थलांतरित न करता त्यांची धरणाच्या शेजारीच पत्र्यांच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली. सध्या येथेच हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत. उन्हाळ््याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात बारवी विभागाचे कार्यकारी अभियंता केंद्रे यांच्याशी संपर्कसाधला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)>तोंडली येथील ग्रामस्थांची मागणी एमआयडीसीने फेटाळली आहे. तसेच जी वंचित कुटुंबे आहेत, त्यांना काही दिवसांतच नुकसानभरपाई देण्यात येईल.-बाळू राऊतराय, उपअभियंता बारवी धरणाच्या पाण्याने तोंडली येथील सुमारे १२५ घरे बाधित झालेली असताना त्यांनी सुमारे २०० लाभार्थ्यांना भरपाई दिलेली आहे. खरोखर नुकसान झालेले पीडित शेतकरी मात्र मदतीपासून वंचित आहे.- हरिश्चंद्र बांगर, ग्रामस्थ