शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

रोजगाराअभावी आदिवासीची आत्महत्या

By admin | Updated: March 14, 2016 02:27 IST

घरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला

हुसेन मेमन,  जव्हारघरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकुळे (३२) असे या आदिवासीचे नाव असून निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजपर्यंत कसल्याही रोजगाराची नोंद नसल्याचे आढळून आले आहे.जव्हारपासून (जि़ पालघर) अवघ्या आठ किमीच्या अंतरावर ७०० लोकवस्तीच्या आपटाळे गावातील सुरेश निकुळे (३२) या आदिवासीने १० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घरात स्वत:ला जाळून घेतले. पत्नीला बाहेर काढून आतून दरवाजा बंद केलेला असल्याने त्यांना वाचविण्यास उशीर झाला व ते ९० टक्के भाजले. मात्र रुग्णालयात न्यायला कसलीच मदत मिळाली नाही. सकाळी अंगणवाडी सेविकेने रु ग्णावाहीकेला फोन केल्यावर त्यांना उपचारासाठी जव्हार कुटीर रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी वंदना निकुळे यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार उघड्यावर पडला आहे .रोजगाराच्या शोधात इतरत्र फिरूनही आठवड्यातील एखाद्या दिवशीच रोजगार मिळत होता. निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमीच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजतागायत कसल्याही रोजगाराची नोंद नाही. ग्रामपंचायतीने रोजगाराची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला होता पण काहीच कार्यवाही झाली नाही. कृषी, ग्रामपंचायत, तहसील अशा कोणत्याच यंत्रणेचे काम या गावापर्यंत पोहचलेच नाही. तर आदिम जमातीला घरकुल योजना लागू असतानाही त्यांना लाभ मिळाला नव्हता. घरात एक पातेले, तांब्या आणि भाकरी थापायला तवा इतकेच सामान आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघातच ही आत्महत्या घडल्याने संताप व्यक्त होत आहे.या घटनेनंतर राजकारणही सुरू झाले असून सरकारी यंत्रणा न पोहोचल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी कुटुंबाची भेट घेऊन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच रोख रकमेची मदत केली. निकुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जवाबदारी घेऊ व मृत सुरेश यांच्या पत्नीला रोजगार देऊ असे जाहीर केले.