शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

मेळघाटातले आदिवासी बनवतात बांबूपासून राख्या

By admin | Updated: August 14, 2016 13:36 IST

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत. त्यांना निसर्ग व मानव यांच्यातील बंध या दृष्टीने सृष्टीबंध असे उचित नाव ठेवण्यात आले आहे. या राख्या 25 ते 40 रुपयांमध्ये असून अत्यंत आकर्षक आहेत.मेळघाट म्हटलं की डोळ्यासमोर सातपुड्याच्या पर्वतरांगांमधला कुपोषणासाठी कुप्रसिद्ध भाग असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, सृष्टी राखीच्या निमित्तानं या भागातले वंचित आदिवासी काय सादर करू शकतात, त्यांची क्षमता काय आहे आणि त्यांच्याकडे कुठली कौशल्ये आहेत हे समोर येतं.दीबेटरइंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार हे आदिवासी परंपरा जपतात, मानवता राखतात आणि पर्यावरणाचं संवर्धनही करतात असे उद्गार संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सचिव सुनील देशपांडे यांनी काढले आहेत.मेळघाटमधल्या आदिवासींनी एकत्र यावं आणि वेणू शिल्पी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करावी असा प्रयत्न या संस्थेने केला. अवघ्या पाच दिवसांच्या प्रशिक्षणानं आदिवासींना सुंदर राख्या बनवता यायला लागल्या, त्याही स्थानिक कच्च्या मालातून असे देशपांडे सांगतात.1998 मध्ये अवघ्या 15 आदिवासी कारागिरांसह सुरू झालेल्या या चळवळीत आज 450 कारागिर आहेत, आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नैसर्गिक उत्पादनांचा पुनर्निर्मितीत कसा वापर करता येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे या राख्या होत. शहरात राहणाऱ्या प्रत्येकानं ही राखी घेतली तर ती या आदिवासींसाठी मदत ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. बांबूच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासींचं जीवनमान बदलू शकतं. मेळघाटातील तवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राकडून या राख्या मागवता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी  http://bambooshrushti.com/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.