शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

मेळघाटातले आदिवासी बनवतात बांबूपासून राख्या

By admin | Updated: August 14, 2016 13:36 IST

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

बांबूपासून बनवलेल्या राख्या यंदाच्या रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून त्या मेळघाटसारख्या आदिवासी भागातील गरीबांनी बनवलेल्या आहेत. त्यांना निसर्ग व मानव यांच्यातील बंध या दृष्टीने सृष्टीबंध असे उचित नाव ठेवण्यात आले आहे. या राख्या 25 ते 40 रुपयांमध्ये असून अत्यंत आकर्षक आहेत.मेळघाट म्हटलं की डोळ्यासमोर सातपुड्याच्या पर्वतरांगांमधला कुपोषणासाठी कुप्रसिद्ध भाग असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, सृष्टी राखीच्या निमित्तानं या भागातले वंचित आदिवासी काय सादर करू शकतात, त्यांची क्षमता काय आहे आणि त्यांच्याकडे कुठली कौशल्ये आहेत हे समोर येतं.दीबेटरइंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार हे आदिवासी परंपरा जपतात, मानवता राखतात आणि पर्यावरणाचं संवर्धनही करतात असे उद्गार संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सचिव सुनील देशपांडे यांनी काढले आहेत.मेळघाटमधल्या आदिवासींनी एकत्र यावं आणि वेणू शिल्पी इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू करावी असा प्रयत्न या संस्थेने केला. अवघ्या पाच दिवसांच्या प्रशिक्षणानं आदिवासींना सुंदर राख्या बनवता यायला लागल्या, त्याही स्थानिक कच्च्या मालातून असे देशपांडे सांगतात.1998 मध्ये अवघ्या 15 आदिवासी कारागिरांसह सुरू झालेल्या या चळवळीत आज 450 कारागिर आहेत, आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नैसर्गिक उत्पादनांचा पुनर्निर्मितीत कसा वापर करता येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे या राख्या होत. शहरात राहणाऱ्या प्रत्येकानं ही राखी घेतली तर ती या आदिवासींसाठी मदत ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. बांबूच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासींचं जीवनमान बदलू शकतं. मेळघाटातील तवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राकडून या राख्या मागवता येऊ शकतात. अधिक माहितीसाठी  http://bambooshrushti.com/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.