शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आदिवासी साहित्य ‘दलित’मध्येच

By admin | Updated: May 20, 2016 01:46 IST

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात आदिवासी साहित्याची नोंद अद्याप दलित साहित्यात असल्याची बाब माहिती अधिकारात उघड

पुणे : आदिवासींची स्वतंत्र अस्मिता असतानाही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळात आदिवासी साहित्याची नोंद अद्याप दलित साहित्यात असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. मराठी भाषा विभागातर्फे मराठी वाङ्मयनिर्मितीसाठी लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य शासनातर्फे सर्वोत्कृष्ट पुस्तकास विविध साहित्य प्रकारांतर्गत उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार दिले जातात. आदिवासी साहित्यासाठी डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ३३ वर्षांपासून प्रलंबित होता. या पुरस्कारासाठी आदिवासी साहित्याची नोंद दलित साहित्यात होत असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. लळीत रंगभूमीचे अध्यक्ष कुंडलिक केदारी यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नातून आदिवासी साहित्याची नोंद अद्याप दलित साहित्यात होत असल्याचे उघड झाले आहे.राज्यात १९७२ मध्ये आदिवासी विकास संचालनालय; तसेच १९८३ मध्ये आदिवासी विकास विभागाची स्थापना झाली. ४४ वर्षे होऊनही स्वतंत्र आदिवासी विभाग असतानाही आदिवासी साहित्याची नोंद स्वतंत्र होत नसल्याचे समोर आले आहे.आदिवासी साहित्यासाठी मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार डॉ. गोविंद गारे यांच्या नावाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या बैठकीत ३ सप्टेंबर २०१५ रोजी चर्चेस आला होता. हा प्रस्ताव मराठी भाषा विभागाकडे ३३ वर्षांपासून प्रलंबित होता. मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)