शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

कब्रस्तानात वृक्षराजी बहरली!

By admin | Updated: July 10, 2016 02:41 IST

येथील मुस्लीम बांधवांकडून आपल्या आप्तेष्टांच्या कबरींजवळ किमान एकतरी रोपटे लावले जात असून, त्याचे संवर्धनही तितक्याच तळमळीने केले जात आहे. पर्यावरणाच्या हितासाठी

- अझहर शेख, नाशिक

येथील मुस्लीम बांधवांकडून आपल्या आप्तेष्टांच्या कबरींजवळ किमान एकतरी रोपटे लावले जात असून, त्याचे संवर्धनही तितक्याच तळमळीने केले जात आहे. पर्यावरणाच्या हितासाठी मुस्लीम समाजाने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे कब्रस्तान बहरले आहे.शहरातील गावठाण भागातच खडकाळी येथील रसूलबाग व चौकमंडई येथील जहांगीर या दोन्ही कब्रस्तानांमध्ये दाट वृक्षराजी बहरली आहे. मागील पाच वर्षांपासून मुस्लीम समुदायामध्ये कबरीजवळ झाड लावण्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. धर्मगुरूंकडून प्रवचनातून होणारे प्रबोधन त्यासाठी उपयोगी ठरले आहे. धर्मगुरूंकडून प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी कब्रस्तानांमध्ये जाऊन दोन कबरींजवळ लावलेल्या रोपट्यांचे उदाहरण सांगितले जाते. पैगंबरांसोबत त्या वेळी असलेल्या सहकाऱ्यांनी त्यामागचे कारण विचारले असता पैगंबर म्हणाले, ‘‘जोपर्यंत या फांद्या हरित राहतील तोपर्यंत त्याचा फायदा कबरीमधील मृत व्यक्तीला पोहचून त्याचे पाप कमी होण्यास मदत होईल.’’ मुहम्मद पैगंबरांनी केलेले कार्य व दिलेली शिकवण म्हणून मुस्लीम समुदाय त्याचे अनुकरण करत मृत आप्तेष्टांच्या कबरीजवळ एक रोपटे लावत त्याची जोपासना येथे करत आहे. गुलाब, मोगरा, चमेली, सोनचाफा यांसारख्या फुलझाडांबरोबरच विलायती चिंच, अशोक, कडूनिंब, वड यांसारख्या प्रजातीची पर्यावरणपूरक रोपेही येथे लावली जात आहेत. या उपक्रमाला सर्व स्तरातून दाद मिळत आहे.हजरत मुहम्मद पैगंबर यांचे कार्य आदर्श आहे. त्यांनी दिलेली शिकवण ही केवळ मानवजातीचेच नव्हे, तर अवघ्या सजीवसृष्टीच्या कल्याणाची आहे. - मौलाना शाकीर रझा, धर्मगुरू