शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरेतील वृक्ष मृत्यूपंथाला...

By admin | Updated: April 25, 2016 05:46 IST

पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत

मनोहर कुंभेजकर,  

मुंबई- पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी आरे प्रशासन कूपनलिकेला परवानगी देत नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन भुयारी मार्गासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा वाद पेटला असतानाच, येथील वृक्ष पाण्याविना जळत असल्याचे बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू बंगर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येथील सुमारे ३ हजार २५० एकरवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. शिवाय मेट्रो कारशेडच्या नावाखाली येथील वृक्षांचा बळी घेतला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील वृक्षांची कत्तलही होत असून, त्याकडे आरे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.आरे कॉलनीमधील वृक्षांना पाणी देता यावे, म्हणून आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत हे कूपनलिकेसाठी परवानगी देत नसल्याने, प्रश्न आणखी जटील झाला आहे, असेही बाळू बंगर यांनी सांगितले. यापूर्वी जेव्हा येथील वृक्ष तोडण्यात आले, तेव्हा सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा झाडांची लागवड करण्यात आली, परंतु सातत्याने असे प्रकार होत असल्याने येथील वनराई कशी टिकून राहणार, असा सवाल बाळू बंगर यांनी केला आहे.आरे कॉलनीमधील वृक्ष पाण्याभावी जळू नयेत, म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्ते डोक्यावर घागर घेऊन येथील वृक्षांना पाणी घालत आहेत.