शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सायली ढमढरेच्या मदतीसाठी प्रवासी संघटना सरसावली

By admin | Updated: October 25, 2016 19:09 IST

कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि.25 - कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली. तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायलीलारेल्वेतर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी कल्याण-कसारा-कजर्त रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विविध मुद्दे उपस्थित केली. सायलीचा अपघात हा रेल्वे प्रशसनाच्या चुकीमुळेच झाल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव,श्याम उबाळे, मिलिंद घायवट यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेतली. सायलीला शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. रेल्वे स्थानकात सात ते नऊ इंच लांबी आणि तीन ते चार इंच रुंदी असण्याची आवश्यकता असताना त्याठिकाणी 10 ते 12 इंचीचा फरक आढळून आला आहे. सायलीचा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी हमाल माधव खेमकर यांनी सांगितले की, सायली फलाट व गाडीच्या गॅपमध्ये पडली. तेव्हा काही प्रवाशांनी साखळी खेचली होती. तेव्हा गार्डने गाडी थांबविण्याची सूचना केली असता तर सायलीचे पाय वाचलेअसते. तसे झाले नसल्याने सायलीच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वेच्या प्रवासी समितीवरील माजी सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. या ठिकाणी मेल एक्सप्रेस गाडय़ा केवळ एक मिनीटे थांबतात. त्यांचा हा थांबा किमान पाच मिनिटांचा करण्यात यावा. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवासी चढणार व उतरणार कसे. तसेच मेल एक्सप्रेस गाडय़ांचे दरवाजे हे अरुंद असतात. त्यामुळे प्रवासी गाडी सूटण्याच्या भितीपोटी एकच गर्दी करतात. त्यामुळे प्रवाशांचा तोल जाऊन ते गाडी व फलाटाच्या गॅपमध्ये पडून मरण पावतात अथवा कायमचे अपंग होतात. याचा विचार रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने करण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाच्या समितीवर कार्यरत असलेले सदस्य किसन तारमळे यांनी आजठाणो येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सायलीची भेट घेतली. तिच्या पालकांकडून घटना जाणून घेतली. येत्या 29 ऑक्टोबर रोजी पुण्यात रेल्वे समितीची बैठक आहे. या बैठकीत सायलीला 1क् लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच तिला रेल्वेच्या नोकरीत समावून घेण्यात यावे असे सांगितले जाणार आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले की, 2015-16 या वर्षात डोंबिवली परिसरात आत्तार्पयत 72 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. दोन वर्षापूर्वी फलाट व गाडीतील गॅप भरुन काढण्याच्या कामासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा पैसा कुणाच्या घशात गेला. सायली ढमढरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी रेल्वेअपघात न्यायप्राधिकरणाकडे दावा दाखल करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे गाडीतून एकूण 45 लाख प्रवाशी दररोज प्रवास करता. त्यांच्या जिविताचे मोल रेल्वे प्रशासनाला नाही. रेल्वे अपघाता मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना केवळ चार लाख व जखमी झालेल्या प्रवाशाला नुकसान भरपाई पोटी केवळ दोन ते तीन लाख रुपये मिळतात. ही रक्कम अयोग्य आहे. मृतांच्याकुटुंबियांना किमान 12 लाख व जखमीला किमान सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान मृत्यूमुखी व जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत रेल्वे प्रवाशाकडून न्याय भावनेने पाहिले जात नाही. रेल्वे प्रकरणात प्रवासी जो र्पयत तक्रार करीत नाही. तोर्पयत रेल्वेप्रशासनाकडून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जात नाही. प्रवाशी जखमी झाला तर त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकडे रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांकडून तत्परता दाखविली जात नाही. रेल्वेचे कल्याणला रुग्णालय आहे. एक अद्यावत रुग्णालय या परिसरात रेल्वेने उभारावे ही मागणी संघाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. तिचा विचार अद्याप रेल्वे प्रशासनाकडून केला जात नाही.