शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सायली ढमढरेच्या मदतीसाठी प्रवासी संघटना सरसावली

By admin | Updated: October 25, 2016 19:09 IST

कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि.25 - कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली. तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायलीलारेल्वेतर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी कल्याण-कसारा-कजर्त रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विविध मुद्दे उपस्थित केली. सायलीचा अपघात हा रेल्वे प्रशसनाच्या चुकीमुळेच झाल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव,श्याम उबाळे, मिलिंद घायवट यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेतली. सायलीला शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. रेल्वे स्थानकात सात ते नऊ इंच लांबी आणि तीन ते चार इंच रुंदी असण्याची आवश्यकता असताना त्याठिकाणी 10 ते 12 इंचीचा फरक आढळून आला आहे. सायलीचा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी हमाल माधव खेमकर यांनी सांगितले की, सायली फलाट व गाडीच्या गॅपमध्ये पडली. तेव्हा काही प्रवाशांनी साखळी खेचली होती. तेव्हा गार्डने गाडी थांबविण्याची सूचना केली असता तर सायलीचे पाय वाचलेअसते. तसे झाले नसल्याने सायलीच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वेच्या प्रवासी समितीवरील माजी सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. या ठिकाणी मेल एक्सप्रेस गाडय़ा केवळ एक मिनीटे थांबतात. त्यांचा हा थांबा किमान पाच मिनिटांचा करण्यात यावा. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवासी चढणार व उतरणार कसे. तसेच मेल एक्सप्रेस गाडय़ांचे दरवाजे हे अरुंद असतात. त्यामुळे प्रवासी गाडी सूटण्याच्या भितीपोटी एकच गर्दी करतात. त्यामुळे प्रवाशांचा तोल जाऊन ते गाडी व फलाटाच्या गॅपमध्ये पडून मरण पावतात अथवा कायमचे अपंग होतात. याचा विचार रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने करण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाच्या समितीवर कार्यरत असलेले सदस्य किसन तारमळे यांनी आजठाणो येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सायलीची भेट घेतली. तिच्या पालकांकडून घटना जाणून घेतली. येत्या 29 ऑक्टोबर रोजी पुण्यात रेल्वे समितीची बैठक आहे. या बैठकीत सायलीला 1क् लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच तिला रेल्वेच्या नोकरीत समावून घेण्यात यावे असे सांगितले जाणार आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले की, 2015-16 या वर्षात डोंबिवली परिसरात आत्तार्पयत 72 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. दोन वर्षापूर्वी फलाट व गाडीतील गॅप भरुन काढण्याच्या कामासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा पैसा कुणाच्या घशात गेला. सायली ढमढरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी रेल्वेअपघात न्यायप्राधिकरणाकडे दावा दाखल करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे गाडीतून एकूण 45 लाख प्रवाशी दररोज प्रवास करता. त्यांच्या जिविताचे मोल रेल्वे प्रशासनाला नाही. रेल्वे अपघाता मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना केवळ चार लाख व जखमी झालेल्या प्रवाशाला नुकसान भरपाई पोटी केवळ दोन ते तीन लाख रुपये मिळतात. ही रक्कम अयोग्य आहे. मृतांच्याकुटुंबियांना किमान 12 लाख व जखमीला किमान सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान मृत्यूमुखी व जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत रेल्वे प्रवाशाकडून न्याय भावनेने पाहिले जात नाही. रेल्वे प्रकरणात प्रवासी जो र्पयत तक्रार करीत नाही. तोर्पयत रेल्वेप्रशासनाकडून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जात नाही. प्रवाशी जखमी झाला तर त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकडे रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांकडून तत्परता दाखविली जात नाही. रेल्वेचे कल्याणला रुग्णालय आहे. एक अद्यावत रुग्णालय या परिसरात रेल्वेने उभारावे ही मागणी संघाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. तिचा विचार अद्याप रेल्वे प्रशासनाकडून केला जात नाही.