शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
4
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
5
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
6
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
7
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
8
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
9
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
12
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
13
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
14
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
15
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
16
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
17
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
18
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
19
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
20
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?

सायली ढमढरेच्या मदतीसाठी प्रवासी संघटना सरसावली

By admin | Updated: October 25, 2016 19:09 IST

कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि.25 - कल्याण रेल्वे स्थानकात 20 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी एक्सप्रेस पकडताना गाडीखाली सापडून सायली ढमढरे या तरुणीला दोन्ही पाय गवाविण्याची वेळ आली. तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सायलीलारेल्वेतर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी कल्याण-कसारा-कजर्त रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आज रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन विविध मुद्दे उपस्थित केली. सायलीचा अपघात हा रेल्वे प्रशसनाच्या चुकीमुळेच झाल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव,श्याम उबाळे, मिलिंद घायवट यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेतली. सायलीला शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली. रेल्वे स्थानकात सात ते नऊ इंच लांबी आणि तीन ते चार इंच रुंदी असण्याची आवश्यकता असताना त्याठिकाणी 10 ते 12 इंचीचा फरक आढळून आला आहे. सायलीचा अपघात झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी हमाल माधव खेमकर यांनी सांगितले की, सायली फलाट व गाडीच्या गॅपमध्ये पडली. तेव्हा काही प्रवाशांनी साखळी खेचली होती. तेव्हा गार्डने गाडी थांबविण्याची सूचना केली असता तर सायलीचे पाय वाचलेअसते. तसे झाले नसल्याने सायलीच्या अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वेच्या प्रवासी समितीवरील माजी सदस्य दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. या ठिकाणी मेल एक्सप्रेस गाडय़ा केवळ एक मिनीटे थांबतात. त्यांचा हा थांबा किमान पाच मिनिटांचा करण्यात यावा. कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवासी चढणार व उतरणार कसे. तसेच मेल एक्सप्रेस गाडय़ांचे दरवाजे हे अरुंद असतात. त्यामुळे प्रवासी गाडी सूटण्याच्या भितीपोटी एकच गर्दी करतात. त्यामुळे प्रवाशांचा तोल जाऊन ते गाडी व फलाटाच्या गॅपमध्ये पडून मरण पावतात अथवा कायमचे अपंग होतात. याचा विचार रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने करण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाच्या समितीवर कार्यरत असलेले सदस्य किसन तारमळे यांनी आजठाणो येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सायलीची भेट घेतली. तिच्या पालकांकडून घटना जाणून घेतली. येत्या 29 ऑक्टोबर रोजी पुण्यात रेल्वे समितीची बैठक आहे. या बैठकीत सायलीला 1क् लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच तिला रेल्वेच्या नोकरीत समावून घेण्यात यावे असे सांगितले जाणार आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले की, 2015-16 या वर्षात डोंबिवली परिसरात आत्तार्पयत 72 प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. दोन वर्षापूर्वी फलाट व गाडीतील गॅप भरुन काढण्याच्या कामासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा पैसा कुणाच्या घशात गेला. सायली ढमढरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी रेल्वेअपघात न्यायप्राधिकरणाकडे दावा दाखल करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे गाडीतून एकूण 45 लाख प्रवाशी दररोज प्रवास करता. त्यांच्या जिविताचे मोल रेल्वे प्रशासनाला नाही. रेल्वे अपघाता मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना केवळ चार लाख व जखमी झालेल्या प्रवाशाला नुकसान भरपाई पोटी केवळ दोन ते तीन लाख रुपये मिळतात. ही रक्कम अयोग्य आहे. मृतांच्याकुटुंबियांना किमान 12 लाख व जखमीला किमान सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. ही मागणी अगदी रास्त आहे. रेल्वे प्रवासा दरम्यान मृत्यूमुखी व जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत रेल्वे प्रवाशाकडून न्याय भावनेने पाहिले जात नाही. रेल्वे प्रकरणात प्रवासी जो र्पयत तक्रार करीत नाही. तोर्पयत रेल्वेप्रशासनाकडून देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जात नाही. प्रवाशी जखमी झाला तर त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्याकडे रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांकडून तत्परता दाखविली जात नाही. रेल्वेचे कल्याणला रुग्णालय आहे. एक अद्यावत रुग्णालय या परिसरात रेल्वेने उभारावे ही मागणी संघाच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सुरु आहे. तिचा विचार अद्याप रेल्वे प्रशासनाकडून केला जात नाही.