शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

भक्तांचा प्रवास सुखकर!

By admin | Updated: August 22, 2016 03:20 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक, परिसरातील नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत.

आविष्कार देसाई,

अलिबाग, दि. 22 - मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक, परिसरातील नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदाही खड्डेमय महामार्गावरूनच प्रवास करावा लागणार, अशी भीती प्रवाशांमध्ये होती. मात्र महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याने गणेशभक्तांचा यंदाचा कोकणातील प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे. सुप्रीम इन्फ्रा या कंपनीने खड्डे भरण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. विविध कारणांनी या कामामध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे बराच कालावधीपासून या महामार्गाचे काम रखडले आहे. विविध संघटना, राजकीय पक्षांनी महामार्गाचे काम लवकरात लवकर करावे, यासाठी आंदोलने, मोर्चेही काढले होते, तरी सुध्दा महामार्गाचे काम धीम्या गतीनेच सुरु होते. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई-पुण्यातील मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गाचा वापर कोकणात जाण्यासाठी करतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरु करुन ते पूर्ण करणे गरजेचे झाले होते. आता खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल.>महामार्गासाठी सात कोटीडांबरीकरण, पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात येत आहेत. या कामासाठी सुप्रीमला सुमारे सात कोटींचा खर्च येणार आहे. सर्व एजन्सीचे मिळून दीडशेहून अधिक कामगार या कामात गुंतले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सप्टेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात येईल, असे सुप्रीम इन्फ्राचे प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत फेगडे यांनी सांगितले.>84 किलोमीटरच्या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी सुप्रीमने सहा एजन्सीना कामाला लावले आहे. स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, स्वामी कन्स्ट्रक्शन, शिवम पेव्हर ब्लॉक, मोनिका कन्स्ट्रक्शन आणि अशोका कन्स्ट्रक्शन कंपनी पळस्पे ते वडखळ या टप्प्यातील खड्डे भरण्याचे काम करीत आहेत, तर वडखळ ते इंदापूर या टप्प्यातील काम सुप्रीम इन्फ्रा आणि आशिष कन्स्ट्रक्शनने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात महामार्गाची परिस्थिती आणखीनच गंभीर होती. मोठमोठे खड्डे पडल्याने तीन तासांच्या अंतरासाठी सुमारे सात तास मोजावे लागत होते. खड्डे आणि वाहतूक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या प्रवाशांना त्यामुळे प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. काही ठिकाणी रूंदीकरणाचे काम सुरू आहे.