शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

‘विदेशात फिरून देश बदलत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:59 IST

बुडणाऱ्या  माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बुडणाऱ्या  माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार नाही, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी केली.एआयएसएफचा संविधान बचाव लाँगमार्च रविवारी बीडमध्ये पोहोचला. यानिमित्त आयोजित रोहित अ‍ॅक्ट परिषदेत कन्हैया कुमार बोलत होता. तो म्हणाला, आज देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. गांधीजींचे नातू हरतात आणि गोडसेंचे वारस जिंकतात, अशी परिस्थिती आहे.शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार या विषयावर आम्हाला आवाज उठवावा लागेल. शिक्षण, रोजगार, आरोग्य या विषयावर बोलावे लागेल. आत्मसन्मानासाठी झगडावे लागेल.मोदी देशाचे निवडून आलेले पंतप्रधान आहेत. म्हणून आम्ही सांसदीय मार्गाने प्रश्न विचारत आहोत. त्यांनी हिटलरची चाल चलू नये. मोदी अपराजित आहेत असे त्यांना वाटते. त्यांनी भ्रमात राहू नये. जर ‘एक देश एक टॅक्स’ हे धोरण असेल, तर ‘एक देश एक न्याय, एक देश एक शिक्षण व्यवस्था’ ही परिस्थिती का राहत नाही, असा सवालही त्याने केला.देशात वर्षाला १२ हजार शेतकरी आत्महत्या होतात आणि पीकविमा घेणाºया कंपनीला वर्षाला १० हजार कोटींचा नफा होतो; गंगा नदीच्या सफाईवर ६० हजार कोटी खर्च होतात. तितका पैसा शेतकऱ्यांना दिला तर आत्महत्या होणार नाहीत, असे सांगून तो म्हणाला, देश वाचवायचा असेल तर या विरोधात आवाज उठवावा लागेल. नुसत्या सभा घेऊन किंवा भाषणे करून हे होणार नाही तर यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन कन्हैय्याकुमार याने कले.