शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगरला दिवसभर वाहतूककोंडी

By admin | Updated: December 26, 2016 02:50 IST

राजगुरुनगरला पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी दिवसभर झालेल्या वाहतूककोंडीने प्रवासी आणि नागरिक हैराण झाले.

राजगुरुनगर : राजगुरुनगरला पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी दिवसभर झालेल्या वाहतूककोंडीने प्रवासी आणि नागरिक हैराण झाले. आजच्या वाहतूककोंडीमुळे सुटीच्या आणि लग्नतिथीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूककोंडीचा अध्याय चालूच ठेवला. सुट्या, यात्रा, लग्नतिथी असल्या, की येथे कायम वाहतूककोंडी होते, हे माहीत असूनही प्रशासनाकडूनकाहीही उपाययोजना होत नाही. नेहमीचे वाहतूक पोलीस रस्त्यांवर लावले जातात आणि ऊन-थंडी-पाऊस असला तरी ते वाहतूक नियोजन करीत राहतात. आठवड्यातून निम्मे दिवस काही ना काही कारणाने वाहतूककोंडी होते, हे माहीत असूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. या भागातून जाणाऱ्या महामार्गाच्या कडेने असंख्य वाहने बेशिस्तपणे उभी केलेली असतात. टपऱ्या, हातगाड्या, अतिक्रमणे यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असूनही त्याबाबत काहीही उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नाही. पाबळ चौकात आणि एसटी स्थानकजवळ वाहने येताना-जाताना नियोजन करण्याची मागणी वेळोवेळी करूनही संबंधित व्यवस्थापन उपाययोजना करीत नाही. या दोन्ही ठिकाणी अनेक वाहने बेशिस्तपणे थांबतात आणि वाहतूककोंडी वाढवितात, पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. फक्त आला दिवस रेटत राहायचा एवढाच मार्ग वाहतूककोंडीबाबत अनुसरला जात आहे. आज तर सकाळपासूनच वाहतूककोंडीला सुरुवात झाली. दुपारी रांगा टोलनाक्यापर्यंत गेल्या होत्या. या भागात असलेली मंगल कार्यालयांमध्ये समारंभ असले, की तेथून वाहतूककोंडीस सुरुवात होते. कार्यक्रम झाला की एकदम वाहने राजगुरुनागरच्या बाजूला यायला निघतात आणि वाहतूककोंडी होते. दुपारी कंपन्यांच्या गाड्या यायला सुरुवात झाली, की वाहतुकीचा ताण वाढतो. सुटीत आणि उत्सव, जत्रा, लग्नाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येतात. या मार्गात असलेले दोन अरुंद पूल वाहतूककोंडी वाढवितात. या सर्व गोष्टी माहीत असतानाही त्याबाबत उपाययोजना होत नाहीत. अनेक उपाययोजना आहेत. पण महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, महसूल आणि नगर परिषद प्रशासनाने एकत्र येऊन व्यवस्था ठरविणे आवश्यक असताना त्याबाबत कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे सामान्य वाहनचालक, प्रवासी, नागरिक त्रस्त होतात आणि नेहमीच्या वाहतूककोंडीला सामोरे जातात. (वार्ताहर)शरद पवार तासभर अडकलेपुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला. त्यांचे वाहन सायंकाळी पाच ते सहाचे दरम्यान चक्क तासभर वाहतूक कोंडीत अडकले होते. महामार्गावर चाकण आणि राजगुरुनगर येथे हमखास गर्दी असते. त्यामुळे शरद पवार यांनाही त्याचा अनुभव घ्यावा लागला. नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना त्यांचे वाहन राजगुरुनगर (ता.खेड) येथे बस स्थानकालगतच्या भागात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मात्र लांबपर्यंत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस आणि तेही हतबल झाले. खुद्द शरद पवार यांनीच प्रत्यक्षात वाहतूक कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तरी या रस्त्याच्या कामाकडे शासनाचे लक्ष जाणार का ? याकडे सामन्यांचे लक्ष लागले आहे. या उपाययोजना कधी होणार? पोलीस ठाण्याजवळून गावात जाणाऱ्या रस्त्याची आणि त्यापुढील मार्गाची सुधारणा केल्यास काही वाहतूक कमी होऊ शकते.चासकमान कालव्याजवळचा रास्ता काँक्रिटीकरणाने मजबूत आणि रुंद केल्यास तेथूनही काही वाहतूक वळविता येऊ शकते.  एसटी स्थानकातून वळणाऱ्या गाड्यांचे नियोजन केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.  जुना मोटार स्टॅन्ड परिसरात गोलाकार एकेरी वाहतूक ठेवल्यास त्रास कमी होऊ शकतो. महामार्ग ते पाबळ रस्त्यावर सिद्धेश्वरजवळून जाणारा रस्ता रुंद आणि काँक्रीटचा केल्यास काही वाहतूक वळविता येऊ शकते.  अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक ठिकाणी जागा दिल्यास अडचण कमी होऊ शकते.