शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

मुंंबई मेट्रोचा प्रवास दिल्ली, बंगळुरूपेक्षा महाग

By admin | Updated: February 9, 2015 05:47 IST

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे

सचिन लुंगसे, मुंबईवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे मुंबई मेट्रोलाही अनुदान मिळाले अथवा करात सवलत मिळाली तर मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.न्यायालयाने मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली आणि मुंबई मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० अशा टप्प्यात वाढले. मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोशी तुलना केली असता दिल्ली मेट्रोच्या १२ किलोमीटरच्या प्रवासाठी ८ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत. आणि बंगळुरू मेट्रोच्या ६ किलो मीटर प्रवासासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. आणि मुंबई मेट्रोचा प्रवास उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर १०, २०, ३०, ४० असा झाला आहे.मुळात दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोसाठी एक्सपोर्ट ड्युटी लागत नाही. शिवाय त्यांना अनेक कर भरावे लागत नाहीत, कस्टम ड्युटी द्यावी लागत नाही किंवा त्यात त्यांना सवलत मिळते. शिवाय दिल्ली आणि बंगळुरू मेट्रो, जी वीज वापरते त्याला अनुदान मिळते. अशा अनेक घटकांमुळे दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोचे प्रवास भाडे नियंत्रणात राहते. परंतु मुंबई मेट्रोला यापैकी कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. मुंबई मेट्रोला १३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर दिल्ली मेट्रोला १.५ व्याजदराने कर्ज मिळते. मुंबई मेट्रोसाठी जी वीज वापरली जाते, त्यासाठी १ युनिटकरिता ११ रुपये मोजावे लागतात. दिल्ली मेट्रो १ युनिटसाठी ६ रुपये मोजते. मुंबई मेट्रोला एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी आणि उर्वरित करदेखील माफ नाहीत, विजेवर अनुदान नाही. परिणामी मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे वाढविण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवलती मिळूनही २०१३-१४ या आर्थिक वर्षांत दिल्ली मेट्रोला १०० कोटींचा तोटा झाला होता. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाढीच्या मंजुरीआधी मुंबई मेट्रोला दिवसागणिक ८० लाखांचा तोटा होत होता आणि आजही तो आकडा तेवढ्याच घरात आहे. परिणामी मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुर मेट्रोशी तुलना करताना मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे कमी होणे गरजेचे असेल, तर मुंबई मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विजेच्या वापरावर अनुदान मिळाले पाहिजे आणि उर्वरित करातही सवलत मिळाली पाहिजे. राज्य अथवा केंद्र सरकारने दरवाढीचा गोंधळ घालताना वरील मुद्दे लक्षात घेतले तर साहजिकच मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल आणि मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळेल.(प्रतिनिधी)