शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंंबई मेट्रोचा प्रवास दिल्ली, बंगळुरूपेक्षा महाग

By admin | Updated: February 9, 2015 05:47 IST

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे

सचिन लुंगसे, मुंबईवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे मुंबई मेट्रोलाही अनुदान मिळाले अथवा करात सवलत मिळाली तर मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.न्यायालयाने मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली आणि मुंबई मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० अशा टप्प्यात वाढले. मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोशी तुलना केली असता दिल्ली मेट्रोच्या १२ किलोमीटरच्या प्रवासाठी ८ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत. आणि बंगळुरू मेट्रोच्या ६ किलो मीटर प्रवासासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. आणि मुंबई मेट्रोचा प्रवास उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर १०, २०, ३०, ४० असा झाला आहे.मुळात दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोसाठी एक्सपोर्ट ड्युटी लागत नाही. शिवाय त्यांना अनेक कर भरावे लागत नाहीत, कस्टम ड्युटी द्यावी लागत नाही किंवा त्यात त्यांना सवलत मिळते. शिवाय दिल्ली आणि बंगळुरू मेट्रो, जी वीज वापरते त्याला अनुदान मिळते. अशा अनेक घटकांमुळे दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोचे प्रवास भाडे नियंत्रणात राहते. परंतु मुंबई मेट्रोला यापैकी कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. मुंबई मेट्रोला १३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर दिल्ली मेट्रोला १.५ व्याजदराने कर्ज मिळते. मुंबई मेट्रोसाठी जी वीज वापरली जाते, त्यासाठी १ युनिटकरिता ११ रुपये मोजावे लागतात. दिल्ली मेट्रो १ युनिटसाठी ६ रुपये मोजते. मुंबई मेट्रोला एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी आणि उर्वरित करदेखील माफ नाहीत, विजेवर अनुदान नाही. परिणामी मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे वाढविण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवलती मिळूनही २०१३-१४ या आर्थिक वर्षांत दिल्ली मेट्रोला १०० कोटींचा तोटा झाला होता. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाढीच्या मंजुरीआधी मुंबई मेट्रोला दिवसागणिक ८० लाखांचा तोटा होत होता आणि आजही तो आकडा तेवढ्याच घरात आहे. परिणामी मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुर मेट्रोशी तुलना करताना मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे कमी होणे गरजेचे असेल, तर मुंबई मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विजेच्या वापरावर अनुदान मिळाले पाहिजे आणि उर्वरित करातही सवलत मिळाली पाहिजे. राज्य अथवा केंद्र सरकारने दरवाढीचा गोंधळ घालताना वरील मुद्दे लक्षात घेतले तर साहजिकच मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल आणि मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळेल.(प्रतिनिधी)