शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

मुंंबई मेट्रोचा प्रवास दिल्ली, बंगळुरूपेक्षा महाग

By admin | Updated: February 9, 2015 05:47 IST

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे

सचिन लुंगसे, मुंबईवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे मुंबई मेट्रोलाही अनुदान मिळाले अथवा करात सवलत मिळाली तर मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.न्यायालयाने मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली आणि मुंबई मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० अशा टप्प्यात वाढले. मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोशी तुलना केली असता दिल्ली मेट्रोच्या १२ किलोमीटरच्या प्रवासाठी ८ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत. आणि बंगळुरू मेट्रोच्या ६ किलो मीटर प्रवासासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. आणि मुंबई मेट्रोचा प्रवास उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर १०, २०, ३०, ४० असा झाला आहे.मुळात दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोसाठी एक्सपोर्ट ड्युटी लागत नाही. शिवाय त्यांना अनेक कर भरावे लागत नाहीत, कस्टम ड्युटी द्यावी लागत नाही किंवा त्यात त्यांना सवलत मिळते. शिवाय दिल्ली आणि बंगळुरू मेट्रो, जी वीज वापरते त्याला अनुदान मिळते. अशा अनेक घटकांमुळे दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोचे प्रवास भाडे नियंत्रणात राहते. परंतु मुंबई मेट्रोला यापैकी कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. मुंबई मेट्रोला १३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर दिल्ली मेट्रोला १.५ व्याजदराने कर्ज मिळते. मुंबई मेट्रोसाठी जी वीज वापरली जाते, त्यासाठी १ युनिटकरिता ११ रुपये मोजावे लागतात. दिल्ली मेट्रो १ युनिटसाठी ६ रुपये मोजते. मुंबई मेट्रोला एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी आणि उर्वरित करदेखील माफ नाहीत, विजेवर अनुदान नाही. परिणामी मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे वाढविण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवलती मिळूनही २०१३-१४ या आर्थिक वर्षांत दिल्ली मेट्रोला १०० कोटींचा तोटा झाला होता. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाढीच्या मंजुरीआधी मुंबई मेट्रोला दिवसागणिक ८० लाखांचा तोटा होत होता आणि आजही तो आकडा तेवढ्याच घरात आहे. परिणामी मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुर मेट्रोशी तुलना करताना मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे कमी होणे गरजेचे असेल, तर मुंबई मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विजेच्या वापरावर अनुदान मिळाले पाहिजे आणि उर्वरित करातही सवलत मिळाली पाहिजे. राज्य अथवा केंद्र सरकारने दरवाढीचा गोंधळ घालताना वरील मुद्दे लक्षात घेतले तर साहजिकच मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल आणि मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळेल.(प्रतिनिधी)