शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By admin | Updated: February 2, 2016 00:55 IST

‘सायकल हे जहॉँ तंदुरुस्ती है वहॉँ...’, ‘राइड सायकल सेव्ह अर्थ’ असा पर्यावरणसंवर्धन आणि आरोग्याचा संदेश देत धैर्यशील पवार यांनी देशभरात सायकलवरून भ्रमण केले

पिंपरी : ‘सायकल हे जहॉँ तंदुरुस्ती है वहॉँ...’, ‘राइड सायकल सेव्ह अर्थ’ असा पर्यावरणसंवर्धन आणि आरोग्याचा संदेश देत धैर्यशील पवार यांनी देशभरात सायकलवरून भ्रमण केले. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्रीनगर ते कन्याकुमारी असा ४ हजार किलोमीटर अंतर त्यांनी अवघ्या ३७ दिवसांत पूर्ण केला. सायकल चालवण्याबाबत जनजागृतीसाठी बारामती येथील ४५ वर्षीय पवार यांनी सायकल मोहीम हाती घेतली. श्रीनगर येथील लाल किल्ला येथून सुरुवात केली. जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ असे नऊ राज्यांतून त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि तंदुरुस्तीची माहिती दिली. प्रवासात नागरिकांना सायकलचे महत्त्व पटवून दिले. इंधन बचतीबरोबरच आरोग्यास होणारे फायदे सांगितले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. इतर सायकलस्वारांनी काही अंतर साथ दिली. देहूरोडजवळील घोरावडेश्वर टेकडी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला गेला. पवार यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर गु्रप केला होता. त्यावर दररोज प्रवासाची माहिती व छायाचित्रे देत होते. ही माहिती व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक असा सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट होत. कोणाचीही मदत न घेता एकट्याने गेल्या महिन्यात मोहीम यशस्वी केली. खडतर घाट, हाडे गोठविणारी थंडी, त्यातच पाऊस अशा प्रतिकूल वातावरणात त्यांनी श्रीनगर ते जम्मू असा ३०५ किलोमीटरचे अंतर कापले. या दरम्यान पॅण्डलचे थ्रेड खराब झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. अंतिम टप्प्यात तमिळनाडूत उष्ण आणि दमट वातावरणामुळे अधिक ताण आला. सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत ते १२५ किलोमीटर अंतर कापत पंजाबमध्ये एका दिवसात सर्वाधिक १६० किलोमीटर अंतराचा प्रवास केला. संध्याकाळनंतर जवळच्या हॉटेलवर मुक्काम करीत, दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे उठून नव्या दम्याने प्रवास सुरू करीत, महामार्गाजवळील गाव आणि शहरातील नागरिकांना प्रतिसाद उत्साह वाढविणारा ठरला. (प्रतिनिधी)