शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: June 11, 2016 02:50 IST

एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत.

नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत. परंतु कँटीनचे सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणाच नसल्याने पाणी रोडवर साचत आहे. एपीएमसीने कँटीनचालकांचेही प्रचंड नुकसान केले असून अधिकृत वाटप केलेल्या कँटीनचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घेतलेली नाही. बाजार समितीमधील देखभाल शाखेच्या अनागोंदी कारभाराविषयी असंतोष वाढू लागला आहे. पाचही मार्केटमधील एकही विकासकाम वेळेत व दर्जात्मक केलेले नाही. व्यापारी, कँटीन व इतर व्यावसायिकांची अडवणूक केली जात आहे. फळ बाजार नवी मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर प्रशासनाने वर्तमानपत्रामध्ये उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात दिली होती. अनेक व्यावसायिकांनी रीतसर टेंडर भरून उपाहारगृहे चालविण्यासाठी घेतली आहेत. एपीएमसीने बांधकाम करून ते व्यवसायासाठी उपलब्ध केले परंतु अद्याप त्यासाठीची बांधकाम परवानगीच घेतलेली नाही. उच्च न्यायालयाने मूळ जागेपेक्षा अजून तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक परवानगी महापालिकेकडून मिळवून दिली जात नाही. तुम्हीच परवानगी आणा असे व्यावसायिकांना सांगितले जात आहे. वास्तविक सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत आहे. बाजार समितीमधील काही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर येथील अनागोंदी कारभाराविषयी माहिती दिली. मार्केटमधील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाली आहेत. रीतसर निविदा भरून उपाहारगृह मिळविले परंतु प्रत्यक्षात आम्हाला करारपत्र देताना उपाहारगृहाचा उल्लेख केला नाही. यामुळे आम्हाला हॉटेल परवाना मिळविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. येथील रस्ते व मलनि:सारण वाहिन्या टाकताना कँटीनचे पाणी मलनि:सारण वाहिनीमध्ये जाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रोडवर आलेले दिसत आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा फटका येथे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)