शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: June 11, 2016 02:50 IST

एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत.

नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत. परंतु कँटीनचे सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणाच नसल्याने पाणी रोडवर साचत आहे. एपीएमसीने कँटीनचालकांचेही प्रचंड नुकसान केले असून अधिकृत वाटप केलेल्या कँटीनचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घेतलेली नाही. बाजार समितीमधील देखभाल शाखेच्या अनागोंदी कारभाराविषयी असंतोष वाढू लागला आहे. पाचही मार्केटमधील एकही विकासकाम वेळेत व दर्जात्मक केलेले नाही. व्यापारी, कँटीन व इतर व्यावसायिकांची अडवणूक केली जात आहे. फळ बाजार नवी मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर प्रशासनाने वर्तमानपत्रामध्ये उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात दिली होती. अनेक व्यावसायिकांनी रीतसर टेंडर भरून उपाहारगृहे चालविण्यासाठी घेतली आहेत. एपीएमसीने बांधकाम करून ते व्यवसायासाठी उपलब्ध केले परंतु अद्याप त्यासाठीची बांधकाम परवानगीच घेतलेली नाही. उच्च न्यायालयाने मूळ जागेपेक्षा अजून तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक परवानगी महापालिकेकडून मिळवून दिली जात नाही. तुम्हीच परवानगी आणा असे व्यावसायिकांना सांगितले जात आहे. वास्तविक सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत आहे. बाजार समितीमधील काही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर येथील अनागोंदी कारभाराविषयी माहिती दिली. मार्केटमधील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाली आहेत. रीतसर निविदा भरून उपाहारगृह मिळविले परंतु प्रत्यक्षात आम्हाला करारपत्र देताना उपाहारगृहाचा उल्लेख केला नाही. यामुळे आम्हाला हॉटेल परवाना मिळविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. येथील रस्ते व मलनि:सारण वाहिन्या टाकताना कँटीनचे पाणी मलनि:सारण वाहिनीमध्ये जाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रोडवर आलेले दिसत आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा फटका येथे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)