शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: June 11, 2016 02:50 IST

एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत.

नवी मुंबई : एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये उपाहारगृह व कँटीन उपलब्ध करून दिले आहेत. परंतु कँटीनचे सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणाच नसल्याने पाणी रोडवर साचत आहे. एपीएमसीने कँटीनचालकांचेही प्रचंड नुकसान केले असून अधिकृत वाटप केलेल्या कँटीनचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घेतलेली नाही. बाजार समितीमधील देखभाल शाखेच्या अनागोंदी कारभाराविषयी असंतोष वाढू लागला आहे. पाचही मार्केटमधील एकही विकासकाम वेळेत व दर्जात्मक केलेले नाही. व्यापारी, कँटीन व इतर व्यावसायिकांची अडवणूक केली जात आहे. फळ बाजार नवी मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर प्रशासनाने वर्तमानपत्रामध्ये उपाहारगृह भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात दिली होती. अनेक व्यावसायिकांनी रीतसर टेंडर भरून उपाहारगृहे चालविण्यासाठी घेतली आहेत. एपीएमसीने बांधकाम करून ते व्यवसायासाठी उपलब्ध केले परंतु अद्याप त्यासाठीची बांधकाम परवानगीच घेतलेली नाही. उच्च न्यायालयाने मूळ जागेपेक्षा अजून तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. परंतु त्यासाठी आवश्यक परवानगी महापालिकेकडून मिळवून दिली जात नाही. तुम्हीच परवानगी आणा असे व्यावसायिकांना सांगितले जात आहे. वास्तविक सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत आहे. बाजार समितीमधील काही व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर येथील अनागोंदी कारभाराविषयी माहिती दिली. मार्केटमधील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाली आहेत. रीतसर निविदा भरून उपाहारगृह मिळविले परंतु प्रत्यक्षात आम्हाला करारपत्र देताना उपाहारगृहाचा उल्लेख केला नाही. यामुळे आम्हाला हॉटेल परवाना मिळविण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. येथील रस्ते व मलनि:सारण वाहिन्या टाकताना कँटीनचे पाणी मलनि:सारण वाहिनीमध्ये जाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी रोडवर आलेले दिसत आहे. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचा फटका येथे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)