शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

मासुंद्यात पायात अडकला कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 03:21 IST

कचराकुंड्यांची साफसफाई महापालिकेने केली नसल्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांच्या पायात अडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मासुंदा तलावास लागून असलेल्या कचराकुंड्यांची साफसफाई महापालिकेने केली नसल्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांच्या पायात अडकला. तुडुंब भरलेल्या कुंड्यांमधील कचऱ्यामुळे तलावाचा फेरफटका मारणाऱ्यांना परिसरातील दुर्गंधीचाही सामना करावा लागला.मासुंदा तलावाच्या संवर्धनासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी व आज सकाळी मानवी साखळी तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ठाणेकरांनी आजही दिला. यामध्ये ठाणे महापालिकेचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. मात्र, याच मानवी साखळीत सहभागी झालेले घंटाळीदेवी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनादेखील कचऱ्यांच्या घाणीला तोंड द्यावे लागले. त्यांनी वेळीच कचराकुंड्या, दुर्गंधी पसरवणारा गाळ, झाडांच्या तोडलेल्या फांद्यांचे छायाचित्र काढून महापालिकेचे हे ‘कर्तृत्व’ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. कचरा एकवेळ नागरिकांनी टाकला असेल, पण कत्तल केलेली झाडे आणि तलावातील गाळ तर नागरिकांनी टाकलेला नाही ना? तो वेळीच उचलून परिसरातील पर्यावरणाचे संतुलन राखणे अपेक्षित आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेने सर्वांचे सहकार्य व मदत मागितलेली आहे; पण महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याचे मोने यांनी सांगितले. >अक्षम्य दुर्लक्ष तलावाभोवतालचे तोडलेली झाडे, गणेशघाटातील दुर्गंधी, काठावर काढलेला गाळ, कचराकुंड्यांतील घाण आदींकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. हे सारे दुर्दैवी असल्याचे मोने यांनी आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. ठाणे महानगरपालिकेला जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येलाही शहर स्वच्छ ठेवण्यात अपयशच आल्याने स्वच्छता अभियान फक्त कागदावर दाखवण्यापुरतेच आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.