शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रामबाग पुलावरील वाहतूक सुरूच

By admin | Updated: August 8, 2016 01:27 IST

भोर तालुक्यातील नीरानदीवरील ब्रिटिशकालीन राणीलक्ष्मीबाई पूल धोकादायक असल्याचे कारण देत वाहतूक बंद करण्यात आली आहे

भोर : भोर तालुक्यातील नीरानदीवरील ब्रिटिशकालीन राणीलक्ष्मीबाई पूल धोकादायक असल्याचे कारण देत वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भोर-पुणे रोडवरील कासुर्डी गु.मा येथील गुंजवणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला १०१ वर्षे, तर पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नीरानदीवरील सारोळा येथील पुलाला ५८ वर्षे, तर महाड-पंढरपूर रोडवरील रामबाग ओढ्यावरील पुलाला १३१ वर्षे पूर्ण झालेल्या या सर्व ब्रिटिशकालीन पुलांवरील वाहतूकसुरू आहे. मग या पुलाला धोका निर्माण होऊ शकत नाही का? भोरचा नीरानदीवरील पूल बंद केला आहे. मग वरील तीनही जिल्हा, राष्ट्रीय, राज्यमार्गावरील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरील वाहतूक बंद होणार का?महाड दुर्घटनेनंतर शासनाला जाग आली आणि राज्यातील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यात भोर तालुक्यातील नीरानदीवरील १९३३ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या सुमारे ८३ वर्षांच्या राणी लक्ष्मीबाई पुलावरील वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे महामार्ग प्राधिकरणाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून पुलाची दुरुस्ती करावी, अन्यथा नवीन पुलाचे काम करून त्यावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव धाडवे यांनी केली आहे.