शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

लोकसहभागातून ६० आरोग्य केंद्रांचा ‘कायापालट’

By admin | Updated: September 15, 2014 03:59 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘कायापालट अभियाना’मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटले आहे

राजाराम लोंढे, कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘कायापालट अभियाना’मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटले आहे. ७२ पैकी ६० आरोग्य केंद्रांत लोकसहभागातून ३ कोटींची कामे झाल्याने या केंद्रांचा चेहरा-मोहरा बदलला आहे. कोल्हापूरची ही नावीन्यपूर्ण योजना राज्याने स्वीकारली आहे. शासन आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून समाजातील सर्वांत शेवटच्या घटकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करते. शाळा, आरोग्य केंद्रांचे कामकाज लोकसहभागाने अधिक गतिमान होते. शाळांमध्ये पालकांमधून शाळा व्यवस्थापन समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्याचे चांगले परिणामही आपण पाहत आहोत. त्याच धर्तीवर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बळकटीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा होता. शासनाच्या निधीतून आरोग्य केंद्रांचा विकास होण्यावर मर्यादा येत असल्याने लोकसहभागातून आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याची संकल्पना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांनी पुढे आणली. सुरुवातीला ७२पैकी ६६ आरोग्य केंद्रांमध्ये हे अभियान सुरू केले. त्यापैकी ६० ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आमचा दवाखाना’ ही भावना या अभियानातून ग्रामस्थांमध्ये रूजली. आरोग्य केंद्रांच्या इमारतीची रंगरंगोटी, रुग्णांसाठी बसण्याची व्यवस्था, पाण्याची सोय, परिसरातील स्वच्छता यामध्ये लोकांचा सहभाग घेतला. लोकांनी स्वत:च्या पैशांतून ही कामे केल्याने त्यांना आरोग्य केंद्रांबद्दल आत्मीयता निर्माण होते. परिणामी, केंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने ‘ओपीडीं’ची संख्याही वाढली आहे.