शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:15 IST

एटीएसचे सुहास वारके झाले कोल्हापूरला पोलीस महानिरीक्षक

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास आठवडाभराचा अवधी उरला असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी जाहीर केल्या. त्यानुसार नाशिकचे आयुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी बदली झाली. त्यांचा पदभार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सोपविला आहे.

नांगरे- पाटील यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथकातील महानिरीक्षक सुहास वारके यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह आठ विशेष महानिरीक्षक, चार उपमहानिरीक्षक, दहा अधीक्षक, सहा अप्पर अधीक्षक, १३ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.महानिरीक्षक दर्जाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक पी.पी. मुत्याल यांची नांदेड परिक्षेत्रात बदली झाली. तेथील एफ.के. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील रिक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. सीआयडीचे सुनील रामानंद यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुरक्षा महामंडळातील प्रवीण साळुंखे यांची बदली करण्यात आली.

नाशिक ग्रामीणचे अधीक्षक संजय दराडे यांची पदोन्नतीवर विक्रीकर विभागात नियुक्ती केली आहे, त्याचप्रमाणे एटीएसमधील उपमहानिरीक्षक दत्ता कराळे यांची ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात बदली केली आहे. तेथील प्रताप दिघावकर यांना एक पद पदावनत केलेल्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाकडे नियुक्ती केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जयंत नाईकनवरे यांची एटीएसला बदली करण्यात आली आहे.

देवेन भारती यांना मिळाले अभयनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. मात्र मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना मात्र अभय देण्यात आले आहे. वास्तविक १५ एप्रिलला त्यांना या पदावर चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने त्यांना आयोगाच्या निर्देशातून अभय देण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. निवडणुकांनंतर पदोन्नती देऊन त्यांची या ठिकाणाहून अन्यत्र बदली केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येते