शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:15 IST

एटीएसचे सुहास वारके झाले कोल्हापूरला पोलीस महानिरीक्षक

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास आठवडाभराचा अवधी उरला असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या सोमवारी जाहीर केल्या. त्यानुसार नाशिकचे आयुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी बदली झाली. त्यांचा पदभार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे सोपविला आहे.

नांगरे- पाटील यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथकातील महानिरीक्षक सुहास वारके यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह आठ विशेष महानिरीक्षक, चार उपमहानिरीक्षक, दहा अधीक्षक, सहा अप्पर अधीक्षक, १३ उपअधीक्षक, साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.महानिरीक्षक दर्जाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक पी.पी. मुत्याल यांची नांदेड परिक्षेत्रात बदली झाली. तेथील एफ.के. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील रिक्तपदावर नियुक्ती करण्यात आली. सीआयडीचे सुनील रामानंद यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुरक्षा महामंडळातील प्रवीण साळुंखे यांची बदली करण्यात आली.

नाशिक ग्रामीणचे अधीक्षक संजय दराडे यांची पदोन्नतीवर विक्रीकर विभागात नियुक्ती केली आहे, त्याचप्रमाणे एटीएसमधील उपमहानिरीक्षक दत्ता कराळे यांची ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात बदली केली आहे. तेथील प्रताप दिघावकर यांना एक पद पदावनत केलेल्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाकडे नियुक्ती केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या जयंत नाईकनवरे यांची एटीएसला बदली करण्यात आली आहे.

देवेन भारती यांना मिळाले अभयनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आयजी ते एसीपी दर्जाच्या ४१ अधिकाºयांच्या बदल्या केल्या. मात्र मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांना मात्र अभय देण्यात आले आहे. वास्तविक १५ एप्रिलला त्यांना या पदावर चार वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर विश्वास असल्याने त्यांना आयोगाच्या निर्देशातून अभय देण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. निवडणुकांनंतर पदोन्नती देऊन त्यांची या ठिकाणाहून अन्यत्र बदली केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येते