शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘अधिकाऱ्यांच्या बदल्या हा तर भाजपाचा नवा उद्योग’

By admin | Updated: May 6, 2016 02:17 IST

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. गेल्या दीड वर्षात एकाच अधिकाऱ्याच्या तीन-चार वेळा बदल्या केल्या जात आहेत. पैसे कमवण्यासाठी भाजपच्या

मुंबई : राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. गेल्या दीड वर्षात एकाच अधिकाऱ्याच्या तीन-चार वेळा बदल्या केल्या जात आहेत. पैसे कमवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी बदल्यांचा नवा उद्योगच सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. बदल्यांबाबत कायदा अस्तित्वात असतानाही तो पाळला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. या बदल्या का केल्या जात आहेत याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे असल्याचे मलिक म्हणाले. सरकारमधील मंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत म्हणून बदल्या होत आहेत की बेकायदेशीर कामे करण्यास हे अधिकारी तयार होत नाहीत म्हणून त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत याचाही खुलासा झाला पाहिजे असे ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा पैसे कमावण्याचा नवा उद्योग शोधून काढला आहे, असा आरोप मलिक यांनी केला. डाळींचा काळा बाजार करणाऱ्यांना सरकार मदत करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. सरकारच्या गोदामात आत्ताही ७ हजार टन डाळ पडून आहे. ही डाळ रेशनिंग दुकानावर का उपलब्ध करून देत नाहीत असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला आहे. सध्या डाळीचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. डाळ उपलब्ध असतानाही सरकार ती रेशनींग दुकानावर देत नाही. त्यामुळे काळा बाजार करणाऱ्यांचे फावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.