शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४०८ उपनिरीक्षकांच्या बदल्या !

By admin | Updated: May 25, 2017 21:48 IST

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४०८ उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४०८ उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये तब्बल २१७ अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार अन्यत्र बदली करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५०वर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २१ जणांना कार्यकाळ पूर्ण होवूनही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री बदल्याचे आदेश जारी करण्यात आली.सध्याच्या ठिकाणाहून बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या ४१०वर उपनिरीक्षकांच्या विनंती अर्ज अमान्य करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (१)अन्वये पोलीस अस्थापना मंडळ क्रमांक दोनने राज्यातील विविध पोलीस अधीक्षक, आयुक्तालये आणि अन्य विभागातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या १९१ पीएसआयच्या बदल्या केल्या आहेत. तर त्याहून जास्त म्हणजे २१७ जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीसाठीचा कार्यकाळ पूर्ण होवूनही वैयक्तिक, कौटुंबिक कारणास्तव सध्याच्या ठिकाणी विनंती केलेल्यापैकी २१ अधिकाऱ्यांची विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. ------------मुंबईतील २०० अधिकारी बदलीसाठी इच्छुक सध्याच्या कार्यरत असलेल्या ठिकाणी मुदतवाढ किंवा मुदतपूर्व इच्छुक पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यासाठी प्रयत्नशील ४१० अधिकाऱ्यांच्या विनंती अर्ज अमान्य केलेले आहेत. त्यामध्ये जवळपास निम्मे म्हणजे २०० जण हे मुंबई आयुक्तालयातील आहेत. त्यामुळे कधीकाळी ‘पोस्टींग’साठी प्रयत्नशील असलेल्या मुंबईत पोलीस दलाची क्रेझ आता संपली असल्याचे स्पष्ट होते. बहुंशात पीएसआय हे २५ ते ३० वयोगटातील असून ऐन उमेदीत त्यांना मुंबईत काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी वर्तुणूक, ड्युटी, बंदोबस्ताचा ताण व राजकीय दबाव आदी कारणामुळे हे तरुण अधिकारी मुंबईतून बाहेर जाण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना सध्याच्या ठिकाणी काम करावे लागणार आहे.