शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

‘दोषी पोलिसांची बदली करणे पुरेसे आहे का?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:13 IST

वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक उपायोजना आखल्याचे म्हणत, १३ भ्रष्टाचारी वाहतूक हवालदारांची बदली अन्य विभागात केल्याची माहिती, बुधवारी वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : वाहतूक विभागातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी अनेक उपायोजना आखल्याचे म्हणत, १३ भ्रष्टाचारी वाहतूक हवालदारांची बदली अन्य विभागात केल्याची माहिती, बुधवारी वाहतूक विभागाने उच्च न्यायालयाला दिली. त्या वेळी दोषी पोलिसांची बदली करणे पुरेसे आहे का? की, आणखी कठोर कारवाई करणे योग्य ठरेल? असा प्रश्न न्यायालयाने केला.वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराबाबत पोलीस दलाच्या शस्त्रास्त्र विभागातील सुनील टोके यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. मोरे व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने वाहतूक विभागाला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयाने दिलेल्या या निर्देशानुसार, वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले, तसेच मुंबईतील वाहतूक विभागाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत, त्याच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू करणार का? अशी विचारणाही उच्च न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला केली.