शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

झाड कोसळल्याने रेल्वे मार्ग चार तास बंद

By admin | Updated: September 19, 2016 02:44 IST

अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीलगत संततधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीलगत संततधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वायशेत येथील आरसीएफ या कारखान्यातील युरिया खत मालगाडीने वाहून नेले जाते, त्या मालगाडीच्या मार्गावर झालखंड-जलपाडा दरम्यान मोठे झाड कोसळले होते. त्यामुळे टीव्हीएसजी सीडी (थळ-चंद्रपूर) ही ४३ डब्यांची मालगाडी मार्ग बंद पडल्यामुळे रविवारी तीन चार तास रुळावर थांबवण्यात आली होती.गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी पावसामुळे मच्छीमारी संघटनेतर्फेकोळी बांधवांना सावधानतेचा इशारा शनिवारीच देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या सूचनेनुसार ४८ तासात रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी व वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रति तास असा राहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत असणार आहे. या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड यांच्यामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्याचे पडसाद अलिबागमध्ये पहावयास मिळाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती मिळताच तालुक्यातील मांडवा-बोडणी, रेवस येथील कोळी बांधवांना संघटनेचे अध्यक्ष विश्वास नाखवा यांनी बंदरावर सूचना लिहून खोलवर मच्छीमारीसाठी गेलेल्या कोळी बांधवांना फोन व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आपत्तीबाबत सूचना दिल्या. वादळीवाऱ्याचा तडाखा वीजवितरण विभागाला देखील बसला.गणपती उत्सव काळात वीज व्यवस्थापनाकडून चोख कामगिरी बजावल्यानंतर अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब व तारा कोसळल्या. सकाळपासूनच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे कुसुंबळे येथे उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा खांब कोसळला. मांडवा धोकवडे येथे दोन खांब अलिबाग पोलीस वसाहत आणि चोंढी येथे विजेचे खांब पडले, तर झराडी गुंजीस आणि कनकेश्वरफाटा येथे विद्युत वाहक तारा झाडांमुळे तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता वीज कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, असे अलिबागचे कार्यकारी अभियंता आय. ए. मुलानी यांनी सांगितले. (वार्ताहर)वाऱ्याने उडाले इमारतीचे पत्रे >शिघे्र येथे शेतकऱ्याचे घर पडलेआगरदांडा : गुरु वारी सायंकाळी प्रचंड वेगाने वारे वाहून मुरुड तालुक्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. पाच ते सात तास पाऊस पडल्याने २३१ मि.मी.नोंद झाली आहे. शेतीला आवश्यक असा पाऊस पडला परंतु प्रचंड वेगाने वारे वाहिल्यामुळे शिघ्रे येथील शेतकरी गोविंद पाटील यांच्या घरावरील कौले, लाकडी वाशे, रिफा, भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.अलिबाग : जोरदार वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे पत्रे उडून गेले. घटनास्थळी नागरी संरक्षण दलाने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीवरील काही पत्रे काढून टाकले. दुपारी दोनच्या सुमारास पाऊस सुरु होता. त्याचवेळी वाराही वेगाने वाहत होता. जिल्हा परिषदेची इमारत समुद्रा जवळच असल्याने वाऱ्याच्या वेगापुढे त्याचे पत्रे उडाले. त्यावेळी नागरी संरक्षण दलाचे जन संपर्क अधिकारी जयपाल पाटील तेथे काही सहकाऱ्यांसह पोचले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी खबरदारी घेत वाऱ्याच्या दाबाने उडणारे पत्रे काढले. नुकसान डोळ्यासमोर असताना, आकस्मिक निधीची तरतूद सुद्धा असताना तातडीने रक्कम अदा व्हावी अशी मागणी गोविंद पाटील या शेतकऱ्याने केली आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे वीज व दूरध्वनी यंत्रणा चार ते पाच तास गायब झाली होती. यामुळे मोठ्या अडणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागला. मुरु ड तालुक्यात २७ डिग्री असणारे तापमान खूप खाली येऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे घेता येईल या पध्दतीने मेहनत करत असतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी भात लागवड करतात. भात पीक घेतल्यानंतर भाजी लागवड केली जाते. भाताची संकरित जातीची बियाणे असल्यामुळे नव्वद दिवसांत तयार होतात. अशाप्रकारे बहुतांश शेती तयार होण्याच्या मार्गावर असताना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कणसे आल्यामुळे वजन वाढल्याने वाऱ्यामुळे पिके जमिनीवर पडली आहेत. मेहनतीने आलेल्या पिकाचे नुकसान पाहून शेतकरी चिंतेत आहे.