शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

झाड कोसळल्याने रेल्वे मार्ग चार तास बंद

By admin | Updated: September 19, 2016 02:44 IST

अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीलगत संततधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली.

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीलगत संततधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. वायशेत येथील आरसीएफ या कारखान्यातील युरिया खत मालगाडीने वाहून नेले जाते, त्या मालगाडीच्या मार्गावर झालखंड-जलपाडा दरम्यान मोठे झाड कोसळले होते. त्यामुळे टीव्हीएसजी सीडी (थळ-चंद्रपूर) ही ४३ डब्यांची मालगाडी मार्ग बंद पडल्यामुळे रविवारी तीन चार तास रुळावर थांबवण्यात आली होती.गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी पावसामुळे मच्छीमारी संघटनेतर्फेकोळी बांधवांना सावधानतेचा इशारा शनिवारीच देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या सूचनेनुसार ४८ तासात रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी व वाऱ्याचा वेग ४५ ते ५५ किमी प्रति तास असा राहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत असणार आहे. या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड यांच्यामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्याचे पडसाद अलिबागमध्ये पहावयास मिळाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती मिळताच तालुक्यातील मांडवा-बोडणी, रेवस येथील कोळी बांधवांना संघटनेचे अध्यक्ष विश्वास नाखवा यांनी बंदरावर सूचना लिहून खोलवर मच्छीमारीसाठी गेलेल्या कोळी बांधवांना फोन व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आपत्तीबाबत सूचना दिल्या. वादळीवाऱ्याचा तडाखा वीजवितरण विभागाला देखील बसला.गणपती उत्सव काळात वीज व्यवस्थापनाकडून चोख कामगिरी बजावल्यानंतर अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब व तारा कोसळल्या. सकाळपासूनच वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे कुसुंबळे येथे उच्च दाबाच्या वीजवाहिनीचा खांब कोसळला. मांडवा धोकवडे येथे दोन खांब अलिबाग पोलीस वसाहत आणि चोंढी येथे विजेचे खांब पडले, तर झराडी गुंजीस आणि कनकेश्वरफाटा येथे विद्युत वाहक तारा झाडांमुळे तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता वीज कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली, असे अलिबागचे कार्यकारी अभियंता आय. ए. मुलानी यांनी सांगितले. (वार्ताहर)वाऱ्याने उडाले इमारतीचे पत्रे >शिघे्र येथे शेतकऱ्याचे घर पडलेआगरदांडा : गुरु वारी सायंकाळी प्रचंड वेगाने वारे वाहून मुरुड तालुक्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. पाच ते सात तास पाऊस पडल्याने २३१ मि.मी.नोंद झाली आहे. शेतीला आवश्यक असा पाऊस पडला परंतु प्रचंड वेगाने वारे वाहिल्यामुळे शिघ्रे येथील शेतकरी गोविंद पाटील यांच्या घरावरील कौले, लाकडी वाशे, रिफा, भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.अलिबाग : जोरदार वाऱ्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या इमारतीचे पत्रे उडून गेले. घटनास्थळी नागरी संरक्षण दलाने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीवरील काही पत्रे काढून टाकले. दुपारी दोनच्या सुमारास पाऊस सुरु होता. त्याचवेळी वाराही वेगाने वाहत होता. जिल्हा परिषदेची इमारत समुद्रा जवळच असल्याने वाऱ्याच्या वेगापुढे त्याचे पत्रे उडाले. त्यावेळी नागरी संरक्षण दलाचे जन संपर्क अधिकारी जयपाल पाटील तेथे काही सहकाऱ्यांसह पोचले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी खबरदारी घेत वाऱ्याच्या दाबाने उडणारे पत्रे काढले. नुकसान डोळ्यासमोर असताना, आकस्मिक निधीची तरतूद सुद्धा असताना तातडीने रक्कम अदा व्हावी अशी मागणी गोविंद पाटील या शेतकऱ्याने केली आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे वीज व दूरध्वनी यंत्रणा चार ते पाच तास गायब झाली होती. यामुळे मोठ्या अडणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागला. मुरु ड तालुक्यात २७ डिग्री असणारे तापमान खूप खाली येऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. कार्लेखिंड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे येथील शेतकरी शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे घेता येईल या पध्दतीने मेहनत करत असतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी भात लागवड करतात. भात पीक घेतल्यानंतर भाजी लागवड केली जाते. भाताची संकरित जातीची बियाणे असल्यामुळे नव्वद दिवसांत तयार होतात. अशाप्रकारे बहुतांश शेती तयार होण्याच्या मार्गावर असताना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. कणसे आल्यामुळे वजन वाढल्याने वाऱ्यामुळे पिके जमिनीवर पडली आहेत. मेहनतीने आलेल्या पिकाचे नुकसान पाहून शेतकरी चिंतेत आहे.