शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

आसाममधील बालकांची तस्करी!

By admin | Updated: March 17, 2016 01:44 IST

कचरा उचलण्यासाठी अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गरिबी आणि बेकारीचा फायदा घेऊन आसाममधील मुलांची तस्करी

नागपूर : कचरा उचलण्यासाठी अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गरिबी आणि बेकारीचा फायदा घेऊन आसाममधील मुलांची तस्करी करण्यात येत आहे. सोलापूरच्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत असलेल्या सहा आसामी मुलांची नागपुरात सुटका करण्यात आली. या घटनेमुळे मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी येथील रेल्वेस्थानकावर आसाममधील १२ ते १७ वयोगटांतील सहा मुले चाइल्ड लाइनच्या समन्वयक गौरी देशपांडे यांना दिसली. देशपांडे यांनी या मुलांची विचारपूस केल्यानंतर त्यांना संशय आला. मुलांसोबतच्या एका युवकाचीही त्यांनी चौकशी केली आणि रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही मुले आसाममधील बोरापट्टा येथील असल्याचे आढळले. मुलांना सोलापूर येथील डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत होते. मैतुल इमाम हुसैन (२५) या दलालाच्या माध्यमातून त्यांना सोलापूर येथे पोहोचविण्यात येत होते. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी बाल संरक्षण अधिनियमांतर्गत रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकास अटक केली व सहाही मुलांना निरीक्षणगृहात पाठविण्यात आले. त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गरिबी आणि बेकारीमुळे पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात आंतरराज्य टोळी सक्रीय आहे. कचरा उचलणे, कारखान्यातील छोटी-मोठी कामे मुलांकडून करून घेण्यात येतात. आम्ही आसामच्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. - मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी