शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

मांजराच्या खवल्यांची तस्करी

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

टोळी जेरबंद : बोलेरो गाडीसह ४० किलो ३०० ग्रॅम खवले जप्त; सर्व संशयित बेळगाव, कारवार परिसरातील

चिपळूण : नवीन बोलेरो गाडीतून खवल्या मांजरांच्या खवलांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी कुंभार्ली घाटातील तपासणी नाका येथे गुरुवारी रात्री १०.४५ वाजता बोलेरो गाडी पाच आरोपींसह जप्त केली. दुर्धर त्वचा रोगावरील औषधे, बुलेटप्रुफ जाकीटासह देवदेवस्कीसाठी या खवल्यांचा वापर होत असल्याने ते महाग आहेत आणि त्यामुळेच त्याची तस्करी केली जाते.ओवळी परिसरात न्यायालयाचे समन्स बजावण्यासाठी गेलेल्या हवालदार राजेंद्र देसाई व प्रकाश शिंदे यांना खवले मांजराची खवले (पँगोलिन) एका बोलेरो गाडीतून (केए २२ झेड ७८६१) कऱ्हाडच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती मिळाली. हवालदार देसाई यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना तत्काळ ही माहिती दिली. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे, चालक प्रभाकर साळवी, वैभव जाधव, रमाकांत शिंदे, डी. के. जाधव, एस. टी. पवार, पी. बी. शिंदे यांनी सापळा रचला. सायंकाळी चार वाजेपर्यंत आरोपी घाटाकडे आले नाहीत. मात्र, तरीही पोलिसांनी आपली ‘फिल्डिंग’ कायम ठेवली. रात्री १०.४५ च्या सुमारास बोलेरो गाडी घाटामध्ये आली. नवीनच दिसणारी ही गाडी पोलिसांनी तपासणीकरिता थांबविली. गाडीमध्ये सीटखाली वेगवेगळे कप्पे करून त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत खवले (पँगोलिन) असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी गाडीतील पाचही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. जप्त केलेली गाडी आणि खवले यांची किंमत सुमारे २७ लाख २४ हजार ३०० रुपये होते. याप्रकरणी सागर दत्तात्रय कदम (वय २७, रा. वडगाव, बेळगाव), रिझवान बाबासाहेब सय्यद (३२, रा. वडगाव, बेळगाव), प्रमोद दत्तात्रय कदम (३२, रा. वडगाव, बेळगाव), (पान ७वर)खवल्यांचा वापर नेमका कशासाठी?खवल्या मांजराचे खवले (पँगोलिन) हे दुर्धर त्वचा रोगावरील औषधे बनविण्यासाठी, बुलेटप्रुफ जाकीट बनविण्यासाठी तसेच देवदेवस्की, जादूटोण्यासाठीही वापरले जाते. त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९, ५१ अन्वये याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी वन खात्याचे सहकार्य घेतले जात आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.खवल्यांना परदेशातही मागणीखवल्या मांजर हा प्राणी वाघासारखा अतिशय महत्त्वाचा व दुर्मीळ प्राण्यांच्या घटकात गणला जातो. अनुसूची क्र.१ मध्ये त्याचा समावेश असतो. त्याच्या खवल्योचा औषधांसाठी वापर केला जात असल्याने त्याची खवले अव्वाच्या सव्वा दराने बाजारात विकली जातात. परदेशात त्याला चांगली मागणी असते, असे प्रभारी परिक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील यांनी सांगितले.